शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

सांगलीच्या लाल मातीला राष्ट्रीय एकात्मतेचा गंध

By admin | Updated: October 19, 2015 23:42 IST

अनेक वर्षांची परंपरा : जात, धर्म, प्रांत आणि भाषेपलीकडचे मल्लविद्यादान--राष्ट्रीय एकात्मता दिन विशेष

अविनाश कोळी- सांगली --धर्म, जात, प्रांत, भाषा, सीमा यांच्या पलीकडे जाऊन सांगलीच्या लाल मातीने पाऊण शतकाहून अधिक काळ राष्ट्रीय एकात्मता जपली आहे. पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजरात अशा अनेक प्रांतातील पैलवानांना सांगलीच्या मातीने स्वत:च्या मुलांप्रमाणे घडविले आणि यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. धार्मिक, प्रांतिक भेदभाव न करता सांगलीच्या मल्लविद्येने राष्ट्रहिताला पोषक अशी चळवळ उभारली. पैलवान हरी नाना पवार यांच्या विद्यार्थीदशेपासूनच एकात्मतेचा दरवळ सुरू झाला होता. शिवरामपंत पटवर्धनांबरोबरच चांदसाहेब शिकलगार यांच्यासारख्या मुस्लिम वस्तादांनी त्यांना पैलू पाडण्यास सुरुवात केली. उमेदीच्या काळात हरी नाना पवार यांचा सकाळचा नाष्टा वस्तादांच्या घरी असायचा. त्यावेळी ते मुस्लिम कुटुंबीय पवारांवर घरच्या लोकांहून अधिक प्रेम करायचे. पवारांच्या विजयासाठी मुस्लिम महिला नवस बोलायच्या. मल्लविद्येला आलेली राष्ट्रीय एकात्मतेची ही परिपक्वता जवळपास ऐंशी ते नव्वद दशकांची आहे. सांगलीची आद्य बजरंग तालीम हाच एकात्मतेचा मंत्र जपत आजवर वाटचाल करीत आहे. मल्लविद्या शिकायला येणारी व्यक्ती कोणत्या प्रांताची, कोणत्या धर्माची, कोणत्या जातीची, कोणती भाषा बोलणारी आहे, याचा विचारच केला जात नसे. विद्येविषयीची आस्था आणि पात्रता या निकषावर याठिकाणी प्रवेश दिला जात असे. पूर्वीपासून पंजाब, हरियाणा, कर्नाटक, इंदौर या ठिकाणाहून मल्ल सांगलीत शिकायला येत आहेत. पूर्वीच्या काळी ठाकूर सिंग, गुत्ता सिंग, सहदेव धारवाडी अशा अनेक मल्लांनी सांगलीचे प्रेम अनुभवले. अलीकडच्या काळात हरियाणाहून आलेला जगदीश कालिरमण, इंदोरचे राकेश पटेल, रोहित पटेल, पंजाबचा गोल्डनसिंग, दिलीपसिंग या पैलवानांना सांगलीच्या मातीने विद्यादान करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविले. आजही पवारांच्या तालमीत कर्नाटकचे अनेक पैलवान मल्लविद्येचे शिक्षण घेत आहेत. शेकडो वर्षांच्या मल्लविद्येच्या परंपरेने जात, धर्म आणि प्रांतापलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देशभर दिला. जिल्ह्यातील एकात्मतेचे रंगमिरजेतील प्रसिद्ध मीरासाहेब दर्ग्यातील गलेफाचा मान शेकडो वर्षांपासून चर्मकार समाजाकडेमिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या आयोजकांमध्ये मुस्लिम समाजाचा पुढाकारसांगली, मिरजेतील मुस्लिम समाजाकडून दरवर्षी एकात्मतेची शिवजयंती कडेगावच्या मोहरमची परंपरा ब्राह्मण समाजाने सुरू केली. दीडशे वर्षांची ही परंपरा आहे. तेथील निम्मे ताबूत हिंदूंचे असतात.गोटखिंडी (ता. वाळवा) येथे मशिदीमध्ये ३५ वर्षांपासून दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरानांद्रे येथील राम-रहीम नवरात्रोत्सव मंडळात ९0 टक्के मुस्लिम कार्यकर्ते इस्लामपुरात संभूआप्पा-बुवाफन उरूसात हिंदू-मुस्लिमांचा सहभागमालगाव (ता. मिरज) येथील बुवाफन उरूस आयोजनात हिंदूंचा सहभागजिल्ह्यातील हळद, कुंकू तयार करण्याची परंपरा अत्तार या मुस्लिम कुटुंबाकडे अनेक वर्षांपासून आहे. गायकीची घराणी असतात, त्याप्रमाणे कुस्तीचे सांगलीचे हे घराणे आहे. अनेक प्रांतांचे, जाती-धर्माचे लोक याठिकाणी येऊन शिकून गेले. आजसुद्धा ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे खेळाच्या माध्यमातून सांगलीने राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र जपला आहे, हे निश्चित. - गौतम पवार, नगरसेवक, सांगली