शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यामध्ये टंचाईच्या तीव्र झळा

By admin | Updated: November 28, 2015 00:18 IST

प्रशासनाकडून उपाययोजना : पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू

सांगली : हुडहुडी भरायला लावणाऱ्या थंडीची चाहूल लागली असताना, जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यांना आतापासूनच टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यंदा मान्सूनने दगा दिल्याने आणि पाणी योजनांनीही वेळेअगोदर माना टाकल्याने, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूरसह निम्म्या जिल्ह्यात पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले असले तरी, येत्या काही महिन्यात अजूनही टंचाईची परिस्थिती गंभीर बनणार असल्याने या भागातील नागरिक केवळ टंचाईच्या विचारानेच धास्तावले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुक्यातील अनेक गावे नेहमीच दुष्काळाशी सामना करताना दिसून येतात. त्यात गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यावर वरुणराजाने खपा मर्जी ठेवल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊसमान होत आहे. ही एक बाजू असली तरी, यातील काही भागाला म्हैसाळसह इतर पाणी योजनांनी चांगलाच दिलासा दिला आहे. मात्र, या पाणी योजना वाढत्या थकबाकीअभावी सध्या अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पाटबंधारे विभागानेही पाणी सोडण्याची तयारी चालवली असली तरी, थकबाकीची जबाबदारी कोण घेणार, यात पाण्याचे आवर्तन अडकले आहे. जिल्ह्यात जत तालुक्यात २५ ठिकाणी, तर तासगावमध्ये एका ठिकाणी टॅँकर चालू असून आटपाडी तालुक्यातून टॅँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य असताना, अजूनही काही प्रमाणात पाण्याचे स्रोत शिल्लक असल्याने पाणी परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात विदारक चित्र आहे. (प्रतिनिधी)टँकर सुरू असलेली गावेजत तालुक्यातील या गावांमध्ये सध्या टॅँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यात उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, बसर्गी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी, वज्रवाड, गुगवाड, सनमडी. यातील काही गावात दोन टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. तासगाव तालुक्यातील नागेवाडी येथे टॅँकरने पाणी पुरवठा सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले.‘म्हैसाळ’च्या आवर्तनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगावसह जत तालुक्यातील काही भागाला वरदायिनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन थकबाकीच्या फेऱ्यात अडकले आहे. ‘म्हैसाळ’ची थकबाकी ३० कोटीच्या वर गेल्याने नवे आवर्तन सुरु होण्यास अडचण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, या भागातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत योजना सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. पाणी पातळी खालावलीयंदा मान्सूनमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७० टक्क्यांच्या आसपास पाऊस झाल्याने जलस्रोत ऐन नोव्हेंबर महिन्यात कोरडे पडले आहेत. समाधानकारक पाऊस नसल्याने टंचाईग्रस्त भागातील पाणी पातळीही वेगाने खालावत चालल्याचे विदारक चित्र आहे. नियमित पावसास सात महिन्याचा कालावधी असल्याने या भागातील टंचाईचा सामना करताना प्रशासनाचे कसब पणाला लागणार आहे.