शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कारखान्यांसाठी नियमांच्या चिंधड्या

By admin | Updated: August 11, 2016 00:54 IST

वसंतदादा बँक घोटाळा : कारखाने, स्वकीयांच्या संस्थांना मुक्तहस्ते कर्जवाटप-

-वसंतदादा बँक  घोटाळा - १अविनाश कोळी -- सांगलीराजकीय बगलबच्चे, नातलग तसेच व्यक्तिगत हितसंबंध जोपासण्यासाठी बँकेतील कारभाऱ्यांनी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षात कर्जवाटपासाठी नियमांच्या चिंधड्या केल्याची बाब चौकशीतून पुढे आली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांना दिलेल्या कर्जवाटपात सर्वाधिक नियम मोडण्यात आले. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने चार मोठ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलेले कर्ज सर्वात जास्त वादग्रस्त बनले आहे. या कर्जदार कारखान्यांमध्ये चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, कडेपूर येथील डोंगराई सागरेश्वर कारखाना, आटपाडीतील माणगंगा, जतमधील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. जरंडेश्वर कारखान्यास ८१ लाखाचे कर्ज विनातारण देण्यात आले होते. कारखान्याच्या हमीपत्रावर एवढी मोठी रक्कम देताना, सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. मुद्दल व व्याजासहीत आता या कारखान्याची थकबाकी २ कोटी ८१ लाखावर गेली आहे. डोंगराई कारखान्यास वाहतूक, तोडणीसाठी ६ सप्टेंबर २00२ रोजी ४ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले. या कर्जासही योग्य तारण घेण्यात आले नाही. त्यामुळे सध्या कर्जाची थकबाकी २0 कोटी ९३ लाखांवर गेली आहे. माणगंगा कारखान्यास २५ फेब्रुवारी २00२ रोजी विनातारण ५ कोटी ४0 लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात आला होता. कारखान्याच्या हमीपत्रावर कर्जाला मुदतवाढही देण्याचा निर्णय झाला. आता या कारखान्याची थकबाकी २२ कोटी ९६ लाख ४७ हजार रुपये झाली आहे. जतच्या डफळे कारखान्यास २८ आॅक्टोबर २00२ रोजी ३ कोटी ५0 लाख रुपये कर्ज देण्यात आले. कारखाना थकबाकीत असतानाही कर्ज मंजूर करण्यात आले. तारण न घेता केवळ हमीपत्रावर कर्ज देण्यात आले होते. २९ डिसेंबर २00३ रोजी कारखान्याच्या विनंती अर्जावर कर्जाला मुदतवाढ देण्यात आली. आता ही थकबाकी १५ कोटी ७३ लाख ६९ हजारावर गेली आहे. या चारही साखर कारखान्यांना कर्जपुरवठा होताना तारण मालमत्तेचा घोळ घालण्यात आला. काहींना विनातारण, तर काहींना योग्य तारण न घेता कर्ज देण्यात आले. त्यामुळे याच्या वसुलीत अनेक अडचणीत आल्या. यांना धरले जबाबदार... कारखान्यांच्या कर्ज प्रकरणात मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक सुरेश आवटी, किरण जगदाळे, शशिकांत कलगोंड पाटील, नरसगोंडा सातगोंडा पाटील, अमरनाथ सदाशिव पाटील, माधवराव ज्ञानदेव पाटील, तुकाराम रामचंद्र पाटील, प्रमिलादेवी प्रकाशराव माने, सुभाष गणपती कांबळे, निवृत्तीराव मारुती पाटील, सतीश आप्पासाहेब बिरनाळे (मृत), जंबुराव दादा थोटे (मृत), भरत महादेव पाटील, विजय विरुपाक्ष घेवारे, अधिकारी बी. डी. चव्हाण व बापूराव साठे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.बँक आपली, नियम आपले आणि मर्जीसुद्धा आपली, अशा भूमिकेतून केवळ राजकीय, व्यक्तिगत हित साधण्यासाठी मुक्तहस्ते कर्जवाटप करण्यात आले. सहकारात स्वाहाकाराचा मंत्र जपताना याठिकाणच्या नेतृत्वाने दाखविलेली एकाधिकारशाही मोठ्या आर्थिक घोटाळ्याला कारणीभूत ठरली. वसंतदादांच्या नावे स्थापन झालेल्या या बँकेने अनेकांच्या आयुष्याला प्रगतीचे पंख देण्याचे काम केले. या पंखांच्या जोरावर गरुडभरारी घेणाऱ्या शेकडो कर्जदारांनी बँकेच्या आर्थिक शिस्तीच्या नरडीचा घोट घेतला. ज्याच्या जोरावर आपण मोठे झालो, ती संस्था टिकावी, अशा भावनेपेक्षा संस्था बुडावी आणि स्वत:चे आणखी भले व्हावे, असा हेतू बाळगणाऱ्यांनी ही संस्था रसातळाला पोहोचविली. आता याच संस्थेतील आर्थिक पापांचे मोजमाप चौकशीच्या माध्यमातून सुरू झाले आहे. या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारी मालिका वाचा आजपासून...