शहरं
Join us  
Trending Stories
1
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
2
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
3
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
4
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
5
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
6
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
7
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
8
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
9
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
10
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
11
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
12
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
13
प्रेमात धोका! संतापलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का
14
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
15
"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री
16
Kashi Vishwanath Temple Owl: काशी विश्वनाथ मंदिरावर दिसले पांढरे घुबड; हे भारतासाठी नक्की कसले संकेत?
17
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
18
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
19
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
20
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

संजयकाकांनी पावशेर ठेवण्याचे कारण नाही!

By admin | Updated: August 22, 2015 00:57 IST

सुनील तटकरे यांचा टोला : पाणीप्रश्नात राजकारण केल्याची टीका

सांगली : आर. आर. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी राज्यपातळीवर घेतला होता. त्यामुळे तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांना निवडून आणल्याबद्दल कोणी पावशेर ठेवण्याचे कारण नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील यांना पत्रकार बैठकीत लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने तटकरे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तासगाव तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीवेळी झालेली हाणामारी, संजयकाकांनी वारंवार केलेली टीका याला तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत आर. आर. पाटील आबांनी राज्यात अनेक विधायक कामे केली. गाडगेबाबा स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियानातून आबा घराघरांपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या पश्चात तासगावात वेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण तो कदापिही सहन केला जाणार नाही. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी राज्यपातळीवर घेतला होता. हा निर्णय जिल्हास्तरावर झालेला नव्हता. त्यामुळे कोणी आ. सुमनताई यांना निवडून आणल्याचे पावशेर ठेवण्याचे कारण नाही. तासगाव-कवठेमहांकाळच्या पाणीप्रश्नी सुमनतार्इंनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते, तरीही सरकारला जाग आलेली नाही. त्यांच्या पत्रावर जनतेला पाणी मिळाले तर आपले भवितव्य धोक्यात येईल, असे काहींना वाटते. ते म्हणाले की, भाजपच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळाकडे दुर्लक्ष होत आहे. तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी विविध कामांसाठी ४० हजार कोटींचे कर्ज काढले जाते. एलबीटी, टोल रद्द करून त्यासाठी कोट्यवधीची तरतूद होते; पण कर्जमाफीसाठी सात ते आठ हजार कोटी सरकारकडे नाहीत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत; पण केंद्राकडे अहवाल देताना केवळ तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दाखविले जाते. सिंचन योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार व दुष्काळी दौऱ्यावरून खा. शरद पवार यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना तटकरे म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास केवळ राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे चित्र रंगविले गेले; पण राज्यातील अनेक साहित्यिकांनी विरोध नोंदविला होता. त्याचा खुलासा करण्याची गरज होती. पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा ठाकरे यांचा आरोप बालीश आहे. त्यांना महाराष्ट्र व शरद पवार कळलेच नाहीत. पवारांनी पुरोगामी विचारांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही सोडण्याची तयारी दर्शविली होती. सरकारला बाहेरून पाठिंबा नाही विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंब्याची भूमिका घेतली होती; पण आता भाजप-शिवसेनेचे एकत्रित संख्याबळ १९० आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देणार नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना भाजपच्या विरोधातही आहे आणि सत्तेतही! शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे वारंवार दुटप्पी भूमिका घेतात. त्यामुळे सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही, असे म्हणत मध्यावधी निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळली. दुष्काळप्रश्नी १४ सप्टेंबरची डेडलाईन राज्यातील दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने १४ सप्टेंबरपर्यंत उपाययोजना हाती न घेतल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची घोषणा तटकरे यांनी केली. या मुदतीनंतर राज्यभर जेलभरो आंदोलन, मोर्चे काढले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.