शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

संजयकाकांनी पावशेर ठेवण्याचे कारण नाही!

By admin | Updated: August 22, 2015 00:57 IST

सुनील तटकरे यांचा टोला : पाणीप्रश्नात राजकारण केल्याची टीका

सांगली : आर. आर. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी राज्यपातळीवर घेतला होता. त्यामुळे तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांना निवडून आणल्याबद्दल कोणी पावशेर ठेवण्याचे कारण नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील यांना पत्रकार बैठकीत लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने तटकरे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तासगाव तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीवेळी झालेली हाणामारी, संजयकाकांनी वारंवार केलेली टीका याला तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत आर. आर. पाटील आबांनी राज्यात अनेक विधायक कामे केली. गाडगेबाबा स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियानातून आबा घराघरांपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या पश्चात तासगावात वेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण तो कदापिही सहन केला जाणार नाही. आबांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वच पक्षांनी राज्यपातळीवर घेतला होता. हा निर्णय जिल्हास्तरावर झालेला नव्हता. त्यामुळे कोणी आ. सुमनताई यांना निवडून आणल्याचे पावशेर ठेवण्याचे कारण नाही. तासगाव-कवठेमहांकाळच्या पाणीप्रश्नी सुमनतार्इंनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते, तरीही सरकारला जाग आलेली नाही. त्यांच्या पत्रावर जनतेला पाणी मिळाले तर आपले भवितव्य धोक्यात येईल, असे काहींना वाटते. ते म्हणाले की, भाजपच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळाकडे दुर्लक्ष होत आहे. तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी विविध कामांसाठी ४० हजार कोटींचे कर्ज काढले जाते. एलबीटी, टोल रद्द करून त्यासाठी कोट्यवधीची तरतूद होते; पण कर्जमाफीसाठी सात ते आठ हजार कोटी सरकारकडे नाहीत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत; पण केंद्राकडे अहवाल देताना केवळ तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दाखविले जाते. सिंचन योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार व दुष्काळी दौऱ्यावरून खा. शरद पवार यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना तटकरे म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास केवळ राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे चित्र रंगविले गेले; पण राज्यातील अनेक साहित्यिकांनी विरोध नोंदविला होता. त्याचा खुलासा करण्याची गरज होती. पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा ठाकरे यांचा आरोप बालीश आहे. त्यांना महाराष्ट्र व शरद पवार कळलेच नाहीत. पवारांनी पुरोगामी विचारांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही सोडण्याची तयारी दर्शविली होती. सरकारला बाहेरून पाठिंबा नाही विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये, यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंब्याची भूमिका घेतली होती; पण आता भाजप-शिवसेनेचे एकत्रित संख्याबळ १९० आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देणार नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना भाजपच्या विरोधातही आहे आणि सत्तेतही! शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे वारंवार दुटप्पी भूमिका घेतात. त्यामुळे सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल, असे वाटत नाही, असे म्हणत मध्यावधी निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळली. दुष्काळप्रश्नी १४ सप्टेंबरची डेडलाईन राज्यातील दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने १४ सप्टेंबरपर्यंत उपाययोजना हाती न घेतल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची घोषणा तटकरे यांनी केली. या मुदतीनंतर राज्यभर जेलभरो आंदोलन, मोर्चे काढले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.