शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

सांगलीवरील पाणी संकट टळले

By admin | Updated: June 30, 2016 23:37 IST

महापालिकेला दिलासा : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कृष्णा नदीत आले दोन फूट पाणी

सांगली : तब्बल आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर सांगलीच्या कृष्णा नदीत कोयनेतून सोडलेले पाणी पोहोचले. दिवसभरात नदीची पाणीपातळी दोन फुटापर्यंत गेली होती. सांगलीत पाणी पोहोचल्याने शहरावरील पाणी टंचाईचे संकट तात्पुरते टळले आहे. ऐन पावसाळ्यातच सांगलीतील कृष्णा नदी कोरडी पडली होती. नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने सांगली व कुपवाड या दोन शहरांवर पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले होते. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून, कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली होती. पण गेले तीन दिवस हे पाणी सांगलीपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली होती. अखेर कोयनेतून सोडलेले पाणी सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंत गुरुवारी पोहोचले. दिवसभरात नदीपात्रात दोन फूट पाणी होते. आणखी दोन ते तीन दिवसात पाणीसाठा वाढणार आहे. तेव्हा सांगली बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाईल. त्यामुळे सध्या नदीपात्रात असलेले दूषित पाणी वाहते होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. सांगलीत कोयनेचे पाणी आल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला. आणखी महिनाभर तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी ताळमेळ साधला असून भविष्यातील पाण्याचेही नियोजन केले आहे. सध्या तरी सांगली व कुपवाड या दोन शहरांवरील पाणी टंचाईचे संकट तूर्तास टळले आहे. पाणी टंचाईचे संकट निर्माण होताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी बुधवारी जॅकेवल परिसरात काही उपाययोजना केल्या होत्या. जॅकवेलमध्ये दीड फूट खोल च्छिद्र पाडून तेथील पाण्याची पातळी वाढविण्यात आली होती. शिवाय जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रातील पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले होते. त्यामुळे बुधवारी सायंकाळनंतर पाणी उपसाचे दोन्ही पंप सुरू झाले होते. या पर्यायामुळे सांगली व कुपवाडला पाणी कमी पडणार नाही, असा दावाही पाणीपुरवठा विभागाने केला होता. (प्रतिनिधी)बुधवारी सायंकाळनंतर महापालिकेच्या जॅकवेलमधील दोन्ही पंप सुरू करण्यात आले होते. या दोन्ही पंपातून दर तासाला ३० लाख लिटर पाण्याचा उपसा केला जातो. पण गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गुरुवारीही काही भागात अपुरा पुरवठा झाला. यशवंतनगर, बालाजीनगर, चिन्मय पार्क परिसरात कमी दाबाने पाणी आले. शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे कार्यकारी अभियंता उपाध्ये यांनी सांगितले.