शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही सांगलीकर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरात संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही बहुतांश नागरिक रस्त्यावरच होते. विशेषत: मारुती रोड, शिवाजी मंडईत नागरिकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरात संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही बहुतांश नागरिक रस्त्यावरच होते. विशेषत: मारुती रोड, शिवाजी मंडईत नागरिकांची गर्दी दिसून येत होती. पोलिसांनी दिवसभरात ठिकठिकाणी नागरिकांनी अडवून चौकशी केली. कोणते ना कारण देत नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दुसऱ्या दिवशीही कायम होते.

कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पहिल्यादिवशी शहरात अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरत होते. दुसऱ्या दिवशीही तेच चित्र शहरात दिसत होते. संचारबंदीत अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले होते. तरीही नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याचे समोर आले आहे. कोणते ना कोणते कारण सांगून नागरिक घराबाहेर पडत आहे. त्यात महिला व तरुणींचा समावेश आहे. किराणा दुकान, बँका, फळ व भाजीपाला विक्रेत्यांकडे होत असलेली गर्दीमुळे कोरोनाचे नियम पायदळी तुटविले जात आहेत.

शहरातील मारुती चौक, हरभट रोड, कापडपेठ या रस्त्यावर नेहमीसारखीच गर्दी होत आहे. सकाळच्या वेळी शिवाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होती. तर सायंकाळी मारुती चौक गर्दी व वाहनांनी फुलला होता. दुपारच्या वेळी मात्र शहरातील बहुतांश रस्ते ओस पडले होते. पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकात बॅरिकेड्स लावले असून बंदोबस्तही तैनात केला आहे. पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम हे स्वत: रस्त्यावर उतरून तपासणी करीत होते.

चौकट

पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकांत बॅरिकेड्स लावून रस्ते अडविले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणीही केली जात आहे. विनाकारण घराबाहेर पडलेल्यांना समज देऊन पुन्हा घरी पाठविले जात आहे. त्यातूनही अनेकांनी पळवाटा शोधल्या आहेत. भाजी आणायला चाललोय, मेडिकलमध्ये जातोय, पार्सल आणण्यासाठी जातोय, अशी कारणे नागरिकांकडून देण्यात येत होती.

चौकट

याठिकाणी होतेय गर्दी

छत्रपती शिवाजी मंडई, कापडपेठ, मारुती रोड, हरभट रोड, विश्रामबाग, शंभरफुटी रोड आदि रस्त्यावर नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय गल्लीबोळातही नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत.