शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

सांगली : अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात संधी : डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:32 IST

मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

सांगली : मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेतून आयएएस, आयपीएसप्रमाणेच इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसमध्ये करिअरच्या अधिक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी सांगलीत केले.

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. शिर्के म्हणाले, अर्थशास्त्र विषयातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या विषयातील संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासगटांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. या विषयांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. काही विषय असे असतात त्यावर जग चालते, त्या या विषयांचा समावेश आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात या विषयाला मागणी आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनालाही महत्त्व द्यावे.

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात येत असून, संशोधन प्रकल्पासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयाने यासाठी प्रस्ताव सादर करून विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढविण्यास प्राधान्य द्यावे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांतून आयएएस, आयपीएस होता येतेच, शिवाय अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आयईएस होऊन देशभरात सेवेची संधी मिळत आहे. विमाशास्त्रातही विद्यार्थ्यांना संधी वाढत आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून आपले करिअर समृध्द करावे. यावेळी ‘सुयेक’चे अध्यक्ष उल्हास माळकर, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, मेधा भागवत, मंगल माळगे, बी. जी. कोरे, संतोष यादव, रोहिणी देशपांडे, सुभाष दगडे, पी. जे. ताम्हनकर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.‘नेट’चा वापरसुध्दा ‘नेटा’नेच कराशिर्के म्हणाले, सध्या मोबाईलवर मिळत असलेल्या इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजनासाठी नको, तर अभ्यासासाठी करावा. नेटव्दारे अभ्यास केल्यास अधिक सोप्या पध्दतीने अभ्यास होतो. नेटचा वापर करून रोजच्या जगण्यातील अर्थशास्त्रही विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे.सांगलीत सोमवारी अर्थशास्त्र परिषदेत डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आर. जी. कुलकर्णी, डॉ. जे. एफ. पाटील, मेधा भागवत उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEconomyअर्थव्यवस्था