शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सांगली : अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात संधी : डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:32 IST

मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

सांगली : मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेतून आयएएस, आयपीएसप्रमाणेच इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसमध्ये करिअरच्या अधिक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी सांगलीत केले.

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. शिर्के म्हणाले, अर्थशास्त्र विषयातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या विषयातील संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासगटांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. या विषयांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. काही विषय असे असतात त्यावर जग चालते, त्या या विषयांचा समावेश आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात या विषयाला मागणी आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनालाही महत्त्व द्यावे.

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात येत असून, संशोधन प्रकल्पासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयाने यासाठी प्रस्ताव सादर करून विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढविण्यास प्राधान्य द्यावे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांतून आयएएस, आयपीएस होता येतेच, शिवाय अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आयईएस होऊन देशभरात सेवेची संधी मिळत आहे. विमाशास्त्रातही विद्यार्थ्यांना संधी वाढत आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून आपले करिअर समृध्द करावे. यावेळी ‘सुयेक’चे अध्यक्ष उल्हास माळकर, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, मेधा भागवत, मंगल माळगे, बी. जी. कोरे, संतोष यादव, रोहिणी देशपांडे, सुभाष दगडे, पी. जे. ताम्हनकर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.‘नेट’चा वापरसुध्दा ‘नेटा’नेच कराशिर्के म्हणाले, सध्या मोबाईलवर मिळत असलेल्या इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजनासाठी नको, तर अभ्यासासाठी करावा. नेटव्दारे अभ्यास केल्यास अधिक सोप्या पध्दतीने अभ्यास होतो. नेटचा वापर करून रोजच्या जगण्यातील अर्थशास्त्रही विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे.सांगलीत सोमवारी अर्थशास्त्र परिषदेत डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आर. जी. कुलकर्णी, डॉ. जे. एफ. पाटील, मेधा भागवत उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEconomyअर्थव्यवस्था