शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST

सांगली : महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक ...

सांगली : महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक स्पॉट निर्माण झालेत. अपघात टाळण्यासाठी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, पण त्यासाठी तीस-पस्तीस लाखांच्या निधीलाही हा विभाग महाग झाला आहे.

पीडब्ल्युडीच्या बेफिकिरीने वर्ष-सहा महिन्यांत अनेकांचे बळी गेलेत. अशास्त्रीय पद्धतीच्या गतिरोधकांमुळे हकनाक प्राण गमवावे लागलेत. पीडब्ल्युडीच्या अन्य रस्त्यांकडे फारसे कुणी बघत नाही, पण सांगली-मिरज रस्ता सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य नसल्याचे जाणवते. रस्त्यावरील पांढरे पट्टे गायब झाले आहेत. नव्याने मारण्याचे कोणतेच नियोजन पीडब्ल्युडीकडे नाही. गेल्या पावसाळ्यानंतर रस्त्याचे घिरडे झाले होते, दुरुस्तीला तीन-चार महिने लागले, तोपर्यंत सांगली-मिरजकरांना वनवास सोसावा लागला.

गतिरोधकांवर पट्टे नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. जीएसटी कार्यालय, सिद्धिविनायक रुग्णालय, कृपामाई रुग्णालय, भारती रुग्णालय, वानलेसवाडी, विजयनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समिती येथील गतिरोधक अत्यंत जीवघेणे आहेत. भारती रुग्णालयासमोरील गतिरोधकांना तर कोणताच शास्त्रीय ताळतंत्र नाही. गतिरोधकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते समितीची परवानगी लागते, पण सांगली-मिरज रस्त्यावर गतिरोधक बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहितीच नसावी असे दिसते.

सहा मार्गिकांचा हा रस्ता देखणा असला तरी तो आता सुरक्षित राहिलेला नाही. साईड पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक व सिग्नलजवळील पट्टे, दुभाजक पट्टे नसल्याने वाहतूक अस्ताव्यस्त सुरू आहे. पट्ट्यांसाठी सुमारे तीस ते पस्तीस लाखांची गरज आहे, पण तो उपलब्ध करण्याची मानसिकता सार्वजनिक बांधकामकडे नाही. आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून गांधी चौकापासून भारती रुग्णालयापर्यंत हायमास्ट दिवे बसविले, पण दुरुस्तीअभावी सर्वत्र अंधार पसरला आहे.

चौकट

द्विवार्षिक निधीच्या उधळपट्टीचे परिणाम

या रस्त्यासाठीचा द्विवार्षिक निधी एकाच वर्षात संपविल्याचे परिणाम आता दिसू लागलेत. देखभाल-दुरुस्तीसाठी निधीच नसल्याने नागरिकांचा वनवास सुरू झाला आहे.