शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सांगलीचे महापौर अडचणीत

By admin | Updated: November 2, 2015 23:59 IST

राजीनामा घेण्यासाठी जयश्रीतार्इंना साकडे : नगरसेवकांचा एक गट आक्रमक

सांगली : महापौर विवेक कांबळे यांना पदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसमधील एका गटाने कंबर कसली आहे. महापालिकेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सोमवारी कांबळे यांना महापौर पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली; पण कांबळे यांनी त्यावर विचार करू, असे उत्तर देत राजीनाम्याला बगल दिली. दरम्यान, काही नगरसेवकांनी जयश्रीताई मदन पाटील यांची भेट घेऊन महापौर हटावसाठी साकडे घातले. महापौरपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित आहे. पालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा सांगलीतून कांचन कांबळे यांना महापौरपदाची संधी देण्यात आली. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची निवड केली होती. त्यांनी सतरा महिने महापौर पदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. फेब्रुवारी महिन्यात नव्या महापौरांची निवड होऊन विवेक कांबळे यांनी पदभार स्वीकारला. कांबळे यांच्या निवडीवेळीच सत्ताधारी गटातून त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला होता. त्याचवेळी उर्वरित सव्वा वर्षात दोन ते तीन महापौर होतील, असे सांगितले जात होते. आता दहा महिने झाले असून, अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. येत्या फेब्रुवारीत नव्या महापौरांची निवड होणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांसाठी अन्य नगरसेवकांना संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून सुरू झाली आहे. मिरजेचे बसवेश्वर सातपुते यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. विद्यमान महापौरांना पदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी कंबर कसली आहे. सोमवारी काँग्रेस पक्षाची बैठक झाल्यानंतर एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने महापौर दालनात कांबळे यांची भेट घेतली. मदन पाटील यांनी कांबळे यांचा राजीनामा घेण्यास सांगितले होते. त्यांच्या इच्छेनुसार आपण राजीनामा द्यावा, असे सांगितले. कांबळे यांनी, मदनभाऊंनी राजीनाम्याचा विषय कोणासमोर काढला होता, कोणकोणत्या नगरसेवकांना त्यांनी निरोप दिला होता, असे उलट प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, मदनभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या गटाची सूत्रे त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे आली आहेत. सोमवारी काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी जयश्रीताई यांनाही महापौरांचा राजीनामा घेण्याचे साकडे घातले. यासंदर्भात सर्व नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांच्याशी त्या चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)शह-काटशह : माघारीचे राजकारणमहापौर विवेक कांबळे यांनी पदभार घेतल्यापासून गेल्या दहा महिन्यांत अनेक वादविवाद झाले. महासभेत अनेकदा महापौरांना आपलाच निर्णय मागे घेण्याची वेळ आली. पाणी खासगीकरण, वित्त आयोगाचा निधी यांसह अनेक विषय त्यांनी रद्द केले. सभागृहातही त्यांना काँग्रेसच्या गटाची फारशी साथ मिळालेली नाही. मध्यंतरी महापौर कांबळे व स्थायी समितीचे सभापती संजय मेंढे यांच्यात उघड संघर्ष झाला होता. प्रत्येकवेळी महासभेतील ऐनवेळचे ठराव हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पालिकेतील पडद्यामागील शह-काटशहामुळेच त्यांची कारकीर्द गाजत आहे.