शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

सांगलीत ‘कोई भूका ना रहे’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पोटाला चिमटे काढून, शरीराचे हाल करून घेत कुणी गरिबीचे चटके सोसत असते, तर कुणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पोटाला चिमटे काढून, शरीराचे हाल करून घेत कुणी गरिबीचे चटके सोसत असते, तर कुणी कर्तव्याच्या ओझ्याखाली दबत असते. अशा सर्व फिरस्त्यांच्या पोटासाठी ‘कोई भूका ना रहे’ अभियान सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. दररोज ६० हून अधिक लोकांना मोफत अन्न दिले जात आहे.

सांगली येथील बाबा सोशल ग्रुप व बाबा चौक मित्र परिवार यांच्या संयुक्‍त विद्यमाने शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनी बाबा चौक येथे १६ फेब्रुवारी २०२१ पासून 'कोई भूका ना रहे’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. या मोफत अन्नछत्राचे उद्घाटन माजी शिक्षण सभापती पद्माकर जगदाळे सर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यामध्ये प्राधान्याने सफाई कर्मचारी, फिरते विक्रेते, वाटसरू, पोस्टमन, भुकेलेले यांना प्राधान्य देऊन दररोज ११ वाजल्यापासून ते जेवण संपेपर्यंत सकाळी एकवेळचे जेवण पुढील वर्षभर दि. १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मोफत देण्याची सोय करण्यात आलेली आहे.

ग्रुपचे अध्यक्ष नालसाब मुल्ला म्हणाले की, आमच्यासमोर लोकांचे पोटासाठी होणारे हाल आम्हाला पाहवले नाहीत. गरीब, गरजू व प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या लोकांच्या पोटासाठी काही तरी करण्याचा विचार आला आणि तो आम्ही कृतीत उतरविला. कर्तव्यभावनेतून आम्ही हे काम करीत आहोत.

यावेळी माजी नगरसेवक शेरू सौदागर, धनंजय पाटील, डॉ. सतीश नाईक, सचिन खांडेकर, आयुब पटेल, शकुर खान, बेडेकर गुरुजी, श्रीकांत लेंगरे, संदीप सपकाळ, सुरेश पुजारी आदी उपस्थित होते.

चौकट

सामाजिक कार्य आदर्शवत

जगदाळे म्हणाले की, वंचित, उपेक्षित घटकांसाठी कर्तव्यभावनेने केलेली समाजसेवा ही कौतुकास्पद व आदर्शवत आहे. मंडळाचे हे कार्य अन्नदान चळवळीला वेगळे स्वरूप देणारे आहे.