शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलांविरोधात सांगली- इस्लामपूर रस्ता रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

सांगली- इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे वीज बिलांविरोधात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन झाले. यामध्ये महेश खराडे, शरद पाटील, डॉ. ...

सांगली- इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे वीज बिलांविरोधात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन झाले. यामध्ये महेश खराडे, शरद पाटील, डॉ. संजय पाटील आदी सहभागी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा तोडणीच्या निषेधार्थ व आयर्विन पुलाला समांतर पुलासाठी सांगली- इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, मराठा सेवा संघ आदींचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. सांगली- इस्लामपूरदरम्यानची वाहतूक रोखून धरली. वीज बिल माफ झालेच पाहिजे, आयर्विनला समांतर पूल झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. वीज बिल माफीसाठी आरपारची लढाई करण्याची भूमिका स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने आयोजित केली होती. त्यानुसार लक्ष्मी फाटा येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. शरद पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. एक तास वाहतूक ठप्प झाली. खराडे म्हणाले की, वाढीव बिलांमुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. ऊर्जामंत्र्यांनी कोरोना काळातील वीज बिल माफीचे आश्वासन पाळले नाही. सांगलीत आयर्विनला समांतर पूल झाला पाहिजे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

शरद पाटील म्हणाले की, सरकारने बिल माफीचे आश्वासन देऊन झुलवत ठेवले. थकबाकीसाठी कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले. यातून सरकारचा दुटप्पीपणा स्पष्ट झाला. वीज बिल माफ करून दिलासा द्यावा. आंदोलनात ॲड. के. डी. शिंदे, संजय बेले, बाबासाहेब सांद्रे, महेश जगताप, सुदर्शन वाडकर, सतीश साखळकर, असीफ बावा, डाॅ. संजय पाटील, तोहिद शेख, शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी, राहुल पाटील, विश्वास कोळी यांच्यासह वीज ग्राहक सहभागी झाले.

चौकट

सरकार शेतकऱ्यांना लुबाडतेय

रघुनाथदादा पाटील म्हणाले, लॉकडाऊनमधील घरगुती व शेतीपंपाचे वीज बिल माफ झाले पाहिजे. वाढीव बिले देऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम सरकार करत आहे. वाढीव बिले देऊन त्यातून ५० टक्के सवलतीचे नाटक करत आहे.