शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

संजयकाका-घोरपडे गटाचा संघर्ष टोकाला--सांगली बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ रोजी होणार आहे. या सभेत माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे संचालक बाजार समितीमधील २२ कर्मचाºयांच्या पदोन्नतीमधील तडजोडीचा मुद्दा उचलून धरून सत्ताधाºयांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. वास्तविक पदोन्नतीचा मुद्दा किरकोळ असला तरी, याला खासदार संजयकाका पाटील आणि ...

ठळक मुद्देबुधवारी सभा; पदोन्नतीमधील तडजोडीचा मुद्दा वादाचा ठरण्याची शक्यताया पार्श्वभूमीवर सभेत कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून संचालक मंडळाने वार्षिक सभेला खासदार पाटील यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ रोजी होणार आहे. या सभेत माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे संचालक बाजार समितीमधील २२ कर्मचाºयांच्या पदोन्नतीमधील तडजोडीचा मुद्दा उचलून धरून सत्ताधाºयांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. वास्तविक पदोन्नतीचा मुद्दा किरकोळ असला तरी, याला खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यातील संघर्षाची किनार आहे. दोन नेत्यांमधील टोकाला गेलेला संघर्षच यातून पुढे येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बाजार समितीची वार्षिक सभा दि. २७ रोजी होत आहे. या सभेत कर्मचाºयांची पदोन्नती आणि जमा-खर्च, लेखापरीक्षणातील अहवाल ठेवण्यात येणार आहे. मागील सभेत सत्ताधारी गटाला घोरपडे यांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. संचालकांमध्ये खडाजंगीही झाली होती. बाजार समितीच्या विरोधात पणनमंत्री आणि पणन संचालकांकडेही अनेक तक्रारी झाल्या आहेत. शिवाय, बाजार समितीच्या विविध कार्यक्रमालाही घोरपडे यांना डावलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सभेत कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून संचालक मंडळाने वार्षिक सभेला खासदार पाटील यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. खासदार पाटील उपस्थित राहिल्यास घोरपडे गटाचे संचालक संघर्ष करणार नाहीत. तसेच सभाही शांततेत होईल, असा विद्यमान सत्ताधारी गटाचा समज आहे.

घोरपडे आणि खासदार पाटील यांच्यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीपासून संघर्ष टोकाला आहे. वास्तविक घोरपडे आणि काका दोघेही भाजपमध्ये आहेत.लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून होते पण, विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष झाला. दि. २३ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या निवडीत बाजार समिती सभापतिपदावर घोरपडे गटाला डावलून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी प्रशांत शेजाळ यांची वर्णी लावली. शेजाळ यांच्या निवडीला खासदार पाटील यांचाही पाठिंबा होता. शेजाळ आणि घोरपडे यांचे फारसे जमत नाही. येथूनच घोरपडे आणि खासदार पाटील गटातील संघर्ष आणखी वाढला.

संचालकांच्या पळवापळवीत सुगलाबाई बिराजदार यांचे संचालकपदही अडचणीत आले. पुढे घोरपडे गटाकडून बाजार समितीमधील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष होते. बाजार समितीने उमदी येथे खरेदी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणातही सत्ताधाºयांना घोरपडेंनी अडचणीत आणले होते. अखेर सत्ताधाºयांनी जमीन खरेदीच रद्द करून वादावर पडदा टाकला.

कर्मचाºयांना पदोन्नती देऊन त्यांना फरकाची रक्कम दिल्याच्या मुद्द्यावरूनही घोरपडे समर्थकांनी पणन संचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.घोरपडे गटाने राष्ट्रवादीशी जुळवून घेतले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा घोरपडे गटाला फायदाही झाला आहे. दोन नेत्यांमधील संघर्ष टोकाला गेल्यामुळे सत्ताधारी गटाकडून बाजार समितीच्या कोणत्याही कार्यक्रमास घोरपडे गटाला निमंत्रितच केले जात नाही. यामुळेही पुन्हा काका-घोरपडे यांच्यातील संघर्ष मिटण्याऐवजी वाढतच गेला आहे. याच दोन नेत्यांमधील वाढत गेलेला दुरावा बाजार समितीमधील संघर्षाची ठिणगी आहे.