शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री

By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात

गजानन पाटील : दरीबडची , अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्राहकांचे अज्ञान यामुळे जत तालुक्यातील गावोगावच्या आठवडा बाजारात निकृष्ट दर्जाच्या, अप्रमाणित खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. उघड्यावर तळून, भाजून, जुनाट, घाणेरड्या वेष्टनात पॅकिंग करून खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. पापडी, शेव, भजी, जिलेबी, वडे, पापडीची उघड्यावर विक्री होते. हे चित्र ग्रामीण भागातील आठवडा बाजारात दिसते. पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य प्रमाणित नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामीण भागातील आठवडा बाजार हे देवाण-घेवाणीचे व खरेदी-विक्रीचे प्रमुख ठिकाण आहे. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. अनेक गावांचा बाजार वेगवेगळ्या दिवशी भरतो. आठवडा बाजारामध्ये उघड्यावर तयार करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. वडा, कांदाभजी, शेव, पापडी तळण्यासाठी वापरलेले तेल, तसेच पीठ, मसाल्याचे पदार्थ, तिखट आदी साहित्य कोणत्या दर्जाचे आहे, याची माहिती सर्वसामान्य ग्राहकाला नसते. तळण्यासाठी तेल डबल फिल्टर केलेले, आयएसओ प्रमाणित कंपनीचे वापरले जात नाही. भेसळयुक्त कमी दर्जाच्या सूर्यफूल तेलाचा वापर केला जातो. परिणामी असे तळलेले पदार्थ खाऊन घसा व पोटाचे त्रास सुरू होतात. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. असे तेलकट पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांना पोटदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, आम्लपित्त, हगवण यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव जाणवतो. तसेच जिलेबी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगामुळे कॅन्सर होण्याचा धोका जास्त संभावतो.बाजारात वडा, कांदाभजी, शेव, जिलेबी, पापडी हे खाद्यपदार्थ उघड्यावर तळले जातात. पदार्थ तयार करताना धूळ, कचरा, माती पडतेच. त्याची उघड्यावरच साठवणूक केली जाते. त्यावर माशा बसतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. वास्तविक गोरगरीब, शेतमजूर लोकच या वस्तूंचे ग्राहक असतात. तसेच ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये पन्नास पैशाला मिळणारा बांबू हा खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. मक्यापासून तयार केलेला हा पदार्थ सर्वच दुकानात मिळतो. त्यावर उत्पादक कंपनीचे नाव असते. परंतु आठवडा बाजारात मळकट वेस्टनात पॅकिंग केलेले आणि कोणत्याही उत्पादक कंपनीचे नाव अथवा इतर माहिती नसणारे हे बांबू सर्रास बेकायदा विकले जात आहेत. परराज्यातून येऊन स्थायिक झालेले लोक पापडी, बटर, पाव, बांबू आदी खाद्यपदार्थ तयार करतात. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग करून त्याची प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग करून त्यांची विक्री करतात. काही उत्पादक वाळूवर पापड भाजून विक्री करतात. बांबूची पोती भरून बाजारात विक्री होते. एक पाकीट दहा रुपयांना विकले जाते. वास्तविक खाद्यपदार्थांना अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता असणे गरजेचे आहे. पण बाजारात कोणताही खाद्यपदार्थ लेबलशिवाय सहज आणि अतिशय कमी दरात उपलब्ध होतो.