शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

भाविकांसह एस. टी.लाही आषाढीची ओढ, सलग दुसऱ्या वर्षी पन्नास लाखाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाली आहे. या निर्णयाचा फटका वारकऱ्यांसह एस. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाली आहे. या निर्णयाचा फटका वारकऱ्यांसह एस. टी. महामंडळालाही बसला आहे. पंढरपूर यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून सांगली विभागाला २०१९मध्ये ४९ लाख ३९ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. या उत्पन्नावर सलग दुसऱ्या वर्षी पाणी सोडावे लागणार आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षापासून एस. टी. महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. वारंवार लागणाऱ्या निर्बंधांमुळे बसेसचे उत्पन्न घटले असून, प्रवासीही मिळत नसल्याचे दिसून येते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात फेऱ्या सुरू झाल्या आहे. त्यामुळे थोडेफार उत्पन्न हाती लागत आहे. हजारो वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात, तर अधिक जण परिवहन महामंडळ तसेच खासगी वाहनाद्वारे पंढरीची वाट धरतात. जे वारकरी पायी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते एस. टी.ने वारी करतात. एस. टी. महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. कोरोना काळात सर्व यात्रा, उत्सव बंद आहेत. त्यामुळे या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ४९ लाखांचा फटका एस. टी. महामंडळाला बसला आहे.

बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या? ११३

त्यातून एस. टी.ला उत्पन्न मिळायचे? ४९,००,०००

प्रवासी एस. टी.तून दरवर्षी प्रवास करायचे? २३,०००

जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या

पंचवीस दिंड्या शहरातून तर जिल्ह्यातून आषाढीला सुमारे चारशेहून अधिक दिंड्या निघतात. १९७०पर्यंत बैलगाड्यांनीशी व नंतर वाहनांसोबत दिंड्या निघू लागल्या. गावोगावचे भक्त एकेकट्याने पायी निघायचे, नंतर सामूहिक स्वरुप येत गेले.

वर्षांहून अधिक जुनी परंपरा सांगलीवाडी येथील रावसाहेब कण्हीरे यांच्या संयोजनाखालील दिंडीला आहे. शंभरहून अधिक वारकऱ्यांचा जथ्था सांगलीवाडीहून आळंदीला ज्येष्ठ वद्य सप्तमीला पोहोचतो व तेथून पंढरपूरला माऊलीच्या भेटीसाठी पायी निघतो.

कोट

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढी वारी रद्द झाल्याने एस. टी.लाही मोठे नुकसान सहन करावे लागले. आषाढीच्या पाच ते सहा दिवसांत जवळपास ५० लाखांचे उत्पन्न जिल्ह्यातून मिळत असे. एस. टी.चे हे नुकसान भरुन न निघणारे आहे.

- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ, सांगली विभाग.

कोट

घरात आजेसासऱ्यांपासून वारीची परंपरा चालत आली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरला जाता आले नाही. पंढरीला न जाता आम्ही राहू शकत नाही. वारी हा आमचा श्वास आहे. त्यामुळे हा काळ आमच्यासाठी अस्वस्थ करणारा आहे.

- सरस्वती जाधव, वारकरी

कोट

वारीशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करवत नाही. आता हा कटू अनुभव आम्ही घेत आहोत. कधी पंढरीचे दार भक्तांसाठी खुले होईल आणि दिंड्यांचे प्रस्थान सुरु होईल, याची प्रतीक्षा लागली आहे.

- सुभाष तिवारी-चोपदार, वारकरी