शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहारात त्रुटींची गर्दी

By admin | Updated: December 26, 2014 00:13 IST

ठेकेदार नामानिराळा : मध्यवर्ती स्वयंपाकघर संकल्पनेची गरज

सांगली : उद्देश चांगला असूनही अनेक त्रुटींची गर्दी झाल्याने शालेय पोषण आहाराला वादाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात निकृष्ट धान्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्यानंतरही या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. छोट्या गावांमधील मोजक्याच शाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर संकल्पनेसह अनेक चांगल्या गोष्टी योजनेत समाविष्ट करून खऱ्याअर्थाने ही योजना आदर्शवत करता येऊ शकते. मात्र त्याबाबत शासकीय पातळीवर प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. शालेय पोषण आहारातील पुरवठा करणारी यंत्रणाच सदोष असल्याने त्याचे परिणाम पुढील यंत्रणेला भोगावे लागतात. शासकीय पातळीवरही केवळ शासकीय आदेशाचेच पालन करण्याबाबत धन्यता मानण्यात येते. योजनेतील त्रुटी दूर करून पोषण आहाराचा एक चांगला पॅटर्न राज्यभर आणि देशभर देण्यासाठी स्थानिक प्रशासनाची कधीच धडपड दिसत नाही. चाकोरीबध्द कामात ते व्यस्त असल्यामुळे वारंवार विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ होत आहे. पंचनामे करायचे, आदेश द्यायचे आणि पडदा टाकायचा, या गोष्टींपुरतीच कारवाईची चक्रे फिरतात. पुढे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ चालू होते. (प्रतिनिधी)मुख्याध्यापकच बळी पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांची मुक्तता करण्यात आल्याचा गवगवा झाला. प्रत्यक्षात आजही चव, वजन, उंची या रजिस्टरांबरोबरच देयकाची कागदपत्रे यात चूक झाल्यास मुख्याध्यापकांनाच बळीचा बकरा बनविले जाते. मध्यवर्ती स्वयंपाकगृह संकल्पनेची गरजछोट्या गावांमध्ये एकच मध्यवर्ती स्वयंपाकगृह करून त्या ठिकाणाहून काही मिनिटातच सर्व शाळांमध्ये शिजविलेले गरम अन्न पोहोचविले जाऊ शकते. यामुळे एकाचवेळी सर्वत्र खर्च होणारे मनुष्यबळ, पैशाचा अपव्यय या गोष्टी थांबविता येऊ शकतात. शासनाचाच यात आर्थिक फायदाही होऊ शकेल. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आहार पुरविण्यासाठी ठेकेदारांच्या अल्प प्रतिसादाचा प्रश्नही निकालात निघेल. योजनेतील अडचणी दूर करुन शिस्तबद्धतेची आवश्यकतागोदामातून धान्य उचलतानाच दर्जा तपासणी यंत्रणा नाहीनिकृष्ट मालाबाबत पंचनामा पथक नाहीभाजी शिजविण्याचे अनुदान वेळेत नाहीवजन मापनात अजूनही इलेक्ट्रॉनिक काट्याची सोय नाहीमसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण अत्यल्पपारदर्शीपणाचा अभावप्रशासनाचेही योजनेकडे दुर्लक्ष होत आहेमाल खराब का होतो?बऱ्याचदा शाळेमध्ये माल उतरविताना तो चांगला असतो. त्यामुळे तो स्वीकारला जातो. प्रत्यक्षात १५ दिवसातच तो खराब होतो. यामागचे कारण तपासून त्याबाबत सुधारणा करण्यासाठी आजवर कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. नव्वद टक्के शाळांमध्ये गोदाम व स्वतंत्र स्वयंपाक गृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे साठवणूक आणि स्वयंपाकगृह याबाबतची तजवीज करण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत.