शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

सांगलीमध्ये पुन्हा पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: June 28, 2016 23:37 IST

टंचाईचे सावट : कृष्णा नदीची सांगलीतील पातळी घटली, पाणीउपसा कमी झाल्याचा परिणाम

सांगली : मान्सूनच्या आगमनाने आनंदलेल्या सांगलीकरांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. सांगलीकरांची तृष्णा भागविणारी कृष्णा नदी कोरडी पडली आहे. नदीपात्रातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. महापालिकेने पाणी उपसा करणाऱ्या दोन पंपांपैकी एक पंप बंद केला असून शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या दोन दिवसात कोयनेतील पाणी सांगलीत दाखल झाले नाही, तर पाणी टंचाई आणखी तीव्र होणार आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यातच सांगलीतील कृष्णा नदी अनेकदा कोरडी पडली होती. नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने सांगली व कुपवाड या दोन शहरांवर पाणी संकट दिवसेंदिवस गडद झाले होते. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून, कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहरांवरील पाणी टंचाईचे संकट तूर्तास टळले होते. आता पुन्हा शहरावर पाणी टंचाईचे सावट आहे. दीड महिन्यानंतर पुन्हा कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदीपात्रातील पाणीसाठा बऱ्याचअंशी कमी झाला आहे. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. महापालिकेने आठवडाभरापूर्वी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. अजूनही पाणी नदीपात्रात आलेले नाही. आणखी दोन दिवसांनी सांगली बंधाऱ्यात पाणी येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस पाण्याची कमतरता भासणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. मंगळवारी दिवसभर शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेने उपनगरांत दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. नदीपात्रात तराफ्यावर मोटारी टाकून पाणी उपसा सुरू आहे. बुधवारी शहरात पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी दोन ते तीन दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी) उपसा कमी : एक पंप बंद महापालिकेकडून दोन पंपांद्वारे दर तासाला ३० लाख लिटर पाणी उपसा केला जातो. नदीपात्रात पाणी नसल्याने पालिकेने एक पंप बंद केला आहे. सध्या २० लाख लिटर पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्याच्या उपशावर निम्म्या शहराचीच तहान भागणार आहे. नागरिकांना कूपनलिकांचा आधार... काही नागरिकांनी अपुरा पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर कूपनलिकांचा आधार घेतला आहे. शहराच्या शंभर फुटी रस्त्यावरील सर्व उपनगरांमध्ये मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. सांगलीच्या वसंतदादा कारखाना, यशवंतनगर, चिंतामणीनगर परिसरातही पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.