शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधकांत खडाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे लांबणीवर पडत असलेल्या बैठका, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर प्रलंबित राहिलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधीनंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनामुळे लांबणीवर पडत असलेल्या बैठका, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर प्रलंबित राहिलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच कालावधीनंतर झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेत लोकप्रतिनिधींनी आपल्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. विकासकामांसाठी निधी वाटप आणि रस्त्यांसह इतर प्रश्नांवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले तर बैठकीच्या मध्यावरच पालकमंत्री जयंत पाटील मुंबईला निघून गेल्यानंतर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सदस्यांचे म्हणणे ऐकून घेत बैठक पूर्ण केली.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे उपस्थित होत्या.

बऱ्याच कालावधीनंतर आढावा बैठक घेतल्याने सुरूवातीपासूनच सदस्यांनी आपले म्हणणे मांडले. शेटफळे (ता. आटपाडी) येथे राज्यमार्गाच्या कामावेळी ३८ घरांची पडझड करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी नुकसान झाले नसल्याचे सांगितले. यावरून पुन्हा चर्चा होताच पालकमंत्री पाटील यांनी याची चौकशी करून विनाकारण घरे पाडली असतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना दिली. आटपाडी येथे एका पोलीस अधिकाऱ्याने वाळूचे पकडलेले ट्रक सोडल्यावरूनही जोरदार चर्चा झाली. अखेर या प्रकरणाचीही चौकशी करून कारवाईच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

नगरपालिका, नगर पंचायतीच्या प्रकल्पांसह इतर विकासकामांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, त्यामुळे कामे रखडल्याचा मुद्दाही चर्चेत आला. याबाबत मुंबईत बैठक घेऊन जागा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी घरांची पडझड झालेल्या १,१०० लाभार्थ्यांना मदतीची रक्कम अजूनही मिळाली नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ९५ हजार १०० रूपयेप्रमाणे अनुदान उपलब्ध झाल्याची माहिती दिली.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच भौतिक सुविधा दर्जेदार करण्यासाठी १४१ शाळांचे मॉडेल स्कूल करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी आमदार मोहनराव कदम, सुरेश खाडे, अनिल बाबर, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चौकट

यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पीक विमा एैच्छिक करण्यात आला असून, केंद्र सरकारने यामधील हिस्सा कमी केल्याने राज्य शासनावर त्याचा बोजा वाढणार आहे. याबाबत राज्य स्तरावर निर्णय घेण्यात येईल. जतमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

चौकट

महावितरणकडून ट्रान्सफाॅर्मर बसविले जात नाहीत व त्याची दुरूस्तीही वेळेत केली जात नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत असल्याचे आमदार विक्रम सावंत यांनी सांगितले. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेत हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.