शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

सर्वच समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST

पलूस : जगाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर भारताची लोकसंख्या वाढत आहे. तथापि जननदर कमी होत आहे. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेवर लोकसंख्यावाढ ...

पलूस : जगाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर भारताची लोकसंख्या वाढत आहे. तथापि जननदर कमी होत आहे. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेवर लोकसंख्यावाढ स्थिरावेल. केवळ वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व समस्या वाढतात, असा बाऊ करणे योग्य नाही. आर्थिक, सामाजिक, विषमतेत बहुतांश समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे आर्थिक समता, सर्वांना समान संधी व सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही. वाय. (आबा) पाटील यांनी व्यक्त केले.

नागराळे (ता. पलूस) येथे ग्रामविकास वाचनालय व्ही. वाय. (आबा) पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व ग्रामपंचायतीतर्फे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त खुले विचारमंथन आयोजित केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. शंकरराव कुंभार म्हणाले, लोकसंख्येचे वाढते संकट गंभीर आहे. त्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य, प्रदूषण पर्यावरणाचा ऱ्हास हाेत आहे. याप्रसंगी झालेल्या खुल्या चर्चेत शशिकांत पाटील, वृक्षमित्र महंमद सैदापुरे बडेभैय, प्रकाश पाटील यांनी परखड मत व्यक्त केले.

याप्रसंगी सुरुवातीला दीपप्रज्वलन करून आद्य समाज क्रांतिकारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी अभिवादन केले. याप्रसंगी प्रा ए. सी. पाटील यांनी स्वागत केले; तर समारोप युवक नेते विशाल दिंडे यांनी केला. चर्चासत्रात डी. एन. पवार, संपतराव जाधव, दादासाहेब पाटील, ग्रंथपाल राहुल पाटील, जितेंद्र पाटील, हणमंतराव दिंडे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.