शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका तटस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर ...

इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संस्थापक राजू शेट्टी यांच्या परस्पर भूमिका जाहीर केल्याने अंतर्गत वाद उफाळला आहे. शेट्टी यांनी मात्र संघटनेची भूमिका तटस्थ असल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक जाहीर होताच वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. यातूनच संघटनेत धुसफूस सुरू झाली. काहींनी संस्थापक व रयत पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे संघटनेच्या पाठीशी असलेल्या ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संघटनेचे कार्यकर्ते तिन्ही गटात आहेत. तेच पॅनल प्रमुखांची राजू शेट्टींशी भेट घडवून आणण्याचे राजकारण करून पत्रकबाजी करत आहेत. त्यातून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यात एकूण सभासदांपैकी ७ ते ८ टक्के सभासद संघटनेला मानतात, असा दावा संघटनेचा आहे. शेट्टी यांनी भूमिका मांडताना समतोलपणा राखला आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या आहेत.

संघटनेचे तालुकाध्यक्ष रविकिरण माने यांनी सभासदांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ज्यांचा एक टनभरही ऊस कारखान्याला जात नाही, त्यांना या निवडणुकीवर भूमिका मांडण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला आहे. माने यांनी म्हटले आहे की, संस्थापक पॅनलला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, ते कारखान्याचे सभासदसुद्धा नाहीत. दुसरीकडे संस्थापक पॅनलची सत्ता असताना काहींनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्याचा मुद्दाही पुढे आणला जात आहे.

कोट

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ‘कृष्णे’च्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. शेतकऱ्यांना न्याय देणे हे संघटनेचे मूळ धोरण आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर कोणालाही पाठिंबा द्यावा. संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याचे अधिकार कोणालाही देण्यात आलेले नाहीत.

- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना