शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

नियमांना डांबर फासून रस्ते निर्मिती

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

महापालिकेचा कारभार : शहरातील नागरिकांमधून संताप

अविनाश कोळी - सांगली -नियम, तरतुदी, कार्यप्रणालीची मार्गदर्शक तत्त्वे यांनाच डांबर फासून महापालिकेने आजवर रस्ते निर्मिती केल्याचे दिसून येते. त्यामुळेच नागरिकांना चांगल्या रस्त्यांचे सुख आजवर मिळू शकले नाही. अल्पायुषी रस्ते करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होत असल्याने आता लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. शहरातील एकही रस्ता सध्या सुस्थितीत नाही. दर्जा काय असतो, याची कल्पना देण्यासाठीही उदाहरणादाखल रस्ता कुठेही दिसत नाही. रस्ते अल्पायुषीच असतात, हे ठासविण्याचा प्रयत्न जणू महापालिका व ठेकेदार करीत असावेत. महापालिकेच्या स्थापनेला १६ वर्षे झाली, तरीही रस्ते निर्मितीच्या प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही. उलट महापालिका जशी अनुभवी होत आहे, तसतसे रस्त्यांचे आयुष्य कमी होत आहे. रस्त्यांच्या कामाचे गणित याठिकाणी वेगळे आहे. म्हणूनच आजवर रस्ते खराब का होतात, याचे उत्तर महापालिकेला अद्याप देता आलेले नाही.तरतुदींचे पालन कोण करणार?५महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम २१0 (३) नुसार महापालिकांना आराखड्यासह रोड रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. रस्त्यांबाबतच्या घडामोडींची नोंद यामध्ये ठेवायची असून, ते सर्वांसाठी खुले ठेवण्याचीही तरतूद आहे. प्रत्यक्षात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडे असे रोड रजिस्टरच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.महापालिकेच्या अधिनियमातील कलम ६३ (१८) नुसार सार्वजनिक रस्ते, पूल बांधणी, दुरुस्ती आणि सुधारणेची जबाबदारी महापालिकेची आहे. २५ सक्तीच्या सेवांमध्ये रस्ते निर्मितीचाही समावेश आहे. शहर सुधार समितीच्यावतीने शहरातील खड्डेप्रश्नी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेला म्हणणे मांडण्याची सूचना न्यायालयाने केल्यानंतर महापालिका क्षेत्रातील एकाही रस्त्यावर एकही खड्डा नाही, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन आयुक्त संजय देगावकर यांनी दाखल केले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आयआरसी काय सांगतेइंडियन रोड काँग्रेसने दिलेले रस्ते निर्मितीचे दर्जात्मक प्रमाण राष्ट्रीय स्तरावर वापरले जाते. त्यांच्या प्रमाणानुसार पॅचवर्कचे काम करताना खड्डा कोणत्याही आकारात असला तरी, चौकोनात तो खणून त्यामध्ये डांबरीकरणासारखे स्तर करून पॅचवर्क करावे, असे म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून पॅचवर्क केले जाते. त्यामुळे काही दिवसातच त्या मुरुमाची माती होऊन शहरातील धुलिकणांच्या प्रमाणात भर पडते. गतिरोधकांनासुद्धा नियमावली आहे. अशा कोणत्याही नियमांचा, प्रमाणांचा आधार महापालिका घेत नाही. त्यामुळेच रस्ते अल्पायुषी होत आहेत.