रिपाइंचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जैलाब शेख म्हणाले, दिल्लीतील आंदोलनात सहभागी गज्जनसिंग या शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान लाठीचार्ज, पाणी फवारणीमुळे मृत्यू झाल्याने, या मृताच्या कुटुंबास पाच कोटी रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
यावेळी रिपाइं शहराध्यक्ष अविनाश कांबळे, संदीप दरबारे, सतीश कांबळे, भीम आर्मीचे रफीक शेख, योगेश लोखंडे, जैद मुलानी, वैभव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.