शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

क्रांतिकारकांचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट

By admin | Updated: August 7, 2016 01:06 IST

पी. साईनाथ : विटा येथे ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ प्रदान

विटा : थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेने ब्रिटिशांची रेल्वे लुटली नाही, तर ब्रिटिशांनी लुटलेला भारतीयांचा पैसा परत आणून तो स्वातंत्र्यासाठी वापरला. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. आतापर्यंत पुरस्कार अनेक मिळाले, पण क्रांतिकारकांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराची तुलना अन्य पुरस्काराशी होऊ शकत नाही, असे मत शनिवारी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील, कॉ. सुभाष पवार, माधवराव मोहिते उपस्थित होते.पी. साईनाथ म्हणाले की, गेल्या २० वर्षात देशात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संख्या ६३ हजार आहे. औरंगाबाद शहरात सध्या १५० मर्सिडीज, बेन्झ या महागड्या गाड्या आहेत. त्याच भागात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. बॅँका अशा महागड्या गाड्या घेण्यासाठी ७.५० टक्के व्याजदराने कर्ज देते. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याच बॅँका १५ टक्के व्याजदराने कर्ज देत आहेत. ही विषमता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आपला देश महासत्ता कसा बनणार?क्रांतिसिंह नाना पाटील लढवय्ये स्वातंत्र्यसेनानी होते. ब्रिटिशांनी लुटून नेलेला पैसा त्यांनी तुफान सेनेच्या सहकार्यातून परत मिळविला व तो स्वातंत्र्यासाठी वापरला. परंतु, आजचे नेते पैशाची लूट करीत असून, ते त्यांच्या खासगी बॅँक खात्यात जमा होत असल्याची टीकाही यावेळी पी. साईनाथ यांनी केली. ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, १६४९ ला इंग्लंडची राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्वात आली. या घटनेची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात त्यावेळी जहागिरी व वतनदारी संपवून अठरापगड जाती एकत्रित करून समतेसाठी लढा दिला. परंतु, आज मूठभर लोकांच्याच घरात लक्ष्मी नांदत आहे. आर्थिक क्षमता सर्वसामान्य लोकांत जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत भारत समृध्द देश होणार नाही.अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास जे. के. (बापू) जाधव, प्रा. पी. ए. शितोळे, इंद्रजित पाटील, नानासाहेब पाटील, उत्तम पवार, शाब्बासराव मुळीक, जयराम मोरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)