शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

वांगीत बरखास्तीचा ठराव; वशी-कुरळपला खडाजंगी

By admin | Updated: January 28, 2015 01:02 IST

ग्रामसभा वादळी : भंगारविक्री व जलवाहिनीमध्ये गैरव्यवहाराचा वांगी ग्रामस्थांचा आरोप

वांगी : वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भंगार विक्री व जलवाहिनी प्रकरणात अनागोंदी कारभार केल्याचा आरोप करीत, ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. येथे २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अरूण पाटणकर होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सखाराम सूर्यवंशी, पांडुरंग पोळ उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी आरोप केला की, ग्रामपंचायतीने जुनी लोखंडी जलवाहिनी काढून नवी बसवली. जुनी लोखंडी जलवाहिनी व अन्य भंगार साहित्याची कोणतीही निविदा न काढता परस्पर विक्री केली. नवीन जलवाहिनी खरेदीत किमतीतही तफावत दिसत आहे. यामुळे संपूर्ण व्यवहाराची नि:पक्षपाती चौकशी व्हावी व ही ग्रामपंचायत त्वरित बरखास्त करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणेच उसास दर द्यावा, या मागणीचा आणि गावात असणारे बिअर बार व देशी दारूचे दुकान बंद करून संपूर्ण गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला. ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करावे, यासह अन्य ठरावही झाले.सरपंच मनीषा कांबळे, उपसरपंच राहुल होनमाने, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, अमोल मोहिते, सुदाम सूर्यवंशी, सूर्योदय सूर्यवंशी, रमेश एडके, दिलीप पाटील, सतीश तुपे, अधिक कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)कुरळप : वशी व कुरळप (ता. वाळवा) येथील ग्रामसभेत वादावादी झाली. या ग्रामसभा गोंधळातच पार पडल्या. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली.वशी येथे ग्रामसभेत राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामावरुन गोंधळास सुरुवात झाली. ग्रामस्थांनी कंत्राटदारास बोलावून निकृष्ट कामाबाबत विचारणा व्हावी, अशी मागणी केली. परंतु सत्ताधाऱ्यांनी, त्याला मार्चअखेर मुदतवाढ द्यावी, असा आग्रह धरल्याने जोरदार वादावादी झाली. अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी दाखल व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे वादास तोंड फुटले. अर्ध्यातून सभा सोडून जात असताना ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना अडवून, लोकांचे प्रश्न मांडू द्यावेत, अशी मागणी केली.सत्ताधारी निघून गेल्यानंतर उरलेल्या १२५ ते १५0 जणांनी प्रतिग्रामसभा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. शासकीय कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले नसल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, असा ठराव मंजूर झाला.ग्रामसेवक डी. पी. सिंग म्हणाले, सरपंच जगन्नाथ पाटील यांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर स्वप्निल व सुनील पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मला आमचे प्रश्न मांडायचे आहेत म्हणून धक्काबुक्की व दमदाटी केली व सरकारी कामात अडथळा आणला.कुरळप येथील ग्रामसभेत तंटामुक्तीचे अध्यक्ष बदलण्याच्या मुद्यावरुन गोंधळ उडाला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. काहीजणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)