शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

वांगीत बरखास्तीचा ठराव; वशी-कुरळपला खडाजंगी

By admin | Updated: January 28, 2015 01:02 IST

ग्रामसभा वादळी : भंगारविक्री व जलवाहिनीमध्ये गैरव्यवहाराचा वांगी ग्रामस्थांचा आरोप

वांगी : वांगी (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भंगार विक्री व जलवाहिनी प्रकरणात अनागोंदी कारभार केल्याचा आरोप करीत, ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा ठराव ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. येथे २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अरूण पाटणकर होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सखाराम सूर्यवंशी, पांडुरंग पोळ उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी आरोप केला की, ग्रामपंचायतीने जुनी लोखंडी जलवाहिनी काढून नवी बसवली. जुनी लोखंडी जलवाहिनी व अन्य भंगार साहित्याची कोणतीही निविदा न काढता परस्पर विक्री केली. नवीन जलवाहिनी खरेदीत किमतीतही तफावत दिसत आहे. यामुळे संपूर्ण व्यवहाराची नि:पक्षपाती चौकशी व्हावी व ही ग्रामपंचायत त्वरित बरखास्त करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणेच उसास दर द्यावा, या मागणीचा आणि गावात असणारे बिअर बार व देशी दारूचे दुकान बंद करून संपूर्ण गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला. ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करावे, यासह अन्य ठरावही झाले.सरपंच मनीषा कांबळे, उपसरपंच राहुल होनमाने, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, अमोल मोहिते, सुदाम सूर्यवंशी, सूर्योदय सूर्यवंशी, रमेश एडके, दिलीप पाटील, सतीश तुपे, अधिक कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)कुरळप : वशी व कुरळप (ता. वाळवा) येथील ग्रामसभेत वादावादी झाली. या ग्रामसभा गोंधळातच पार पडल्या. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली.वशी येथे ग्रामसभेत राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामावरुन गोंधळास सुरुवात झाली. ग्रामस्थांनी कंत्राटदारास बोलावून निकृष्ट कामाबाबत विचारणा व्हावी, अशी मागणी केली. परंतु सत्ताधाऱ्यांनी, त्याला मार्चअखेर मुदतवाढ द्यावी, असा आग्रह धरल्याने जोरदार वादावादी झाली. अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी दाखल व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे वादास तोंड फुटले. अर्ध्यातून सभा सोडून जात असताना ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांना अडवून, लोकांचे प्रश्न मांडू द्यावेत, अशी मागणी केली.सत्ताधारी निघून गेल्यानंतर उरलेल्या १२५ ते १५0 जणांनी प्रतिग्रामसभा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. शासकीय कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले नसल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, असा ठराव मंजूर झाला.ग्रामसेवक डी. पी. सिंग म्हणाले, सरपंच जगन्नाथ पाटील यांनी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर स्वप्निल व सुनील पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मला आमचे प्रश्न मांडायचे आहेत म्हणून धक्काबुक्की व दमदाटी केली व सरकारी कामात अडथळा आणला.कुरळप येथील ग्रामसभेत तंटामुक्तीचे अध्यक्ष बदलण्याच्या मुद्यावरुन गोंधळ उडाला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. काहीजणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)