शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यप्रेमाची श्रीमंती मिरविणारा कार्यकर्ता शिक्षक

By admin | Updated: May 20, 2016 00:07 IST

अनपेक्षितपणे त्यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस एका संमेलनासारखा साजरा करुन गौरविलं.

एखाद्या शिक्षकाचा पन्नासावा वाढदिवस त्याचे सर्व आजी-माजी विद्यार्थी एकत्र येऊन साजरा करतात. गुरुला सगळे मिळून चक्क चारचाकी गाडी भेट देतात. मानपत्र देऊन त्याचा हृद्य गौरव करतात... असं चित्र एखाद्या शिक्षकाच्या वाट्याला अलीकडच्या काळात क्वचितच येईल. पण भीमराव ईश्वरा धुळूबुळू नावाच्या, मिरजेत गेली २५ वर्षे अकौन्टन्सीचे क्लासेस घेणाऱ्या एका हाडाच्या शिक्षकाला निरपेक्षपणे केलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कामामुळे शिष्यप्रेमाची ही निर्व्याज श्रीमंती प्राप्त झाली आहे. शिक्षकाची भूमिका बजावताना हा कविमनाचा माणूस विद्यार्थ्यांचा हळवा पालकही होतो. त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा निर्वेध मार्ग तयार करण्यासाठी आयुष्याचा दिवा करतो. अभ्यासक्रमाबाहेर जाऊन विद्यार्थी चांगली माणसं कशी होतील, यासाठी समाजाबरोबर चळवळत राहतो. याची जाण ठेवून दोन वर्षांपूर्वी या निर्मळ मनाच्या शिक्षकाला, अनपेक्षितपणे त्यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस एका संमेलनासारखा साजरा करुन गौरविलं. थोडीशी जिराईत शेती वाट्याला आलेले भीमरावचे वडील ईश्वरा धुळूबुळू आणि भाजी विकून संसाराला हातभार लावणारी आई, अशा काबाडकष्ट करणाऱ्या जोडप्याचं भीमराव हे शेंडेफळ. ईश्वरा धुळूबुळू भेदिक गायचे. लोकसंगीत आणि लोककलांमध्ये ते पारंगत होते. दानपट्टा चालवायचे. छोटा भीमा त्यांच्याबरोबर भेदिक म्हणायला जायचा. त्याच्या कोवळ्या मनावर या लोकसंगीताचा चांगलाच प्रभाव पडला आणि वयाच्या १२ व्या वर्षी सहावीत असताना त्यानं या शाहिरांच्या संचासाठी उत्तम गाणं लिहिलं. बाबू भैरू शेरबंदे आणि शंकर मेंढे या त्यावेळच्या गाजलेल्या शाहिरांनी हे वेगळ गाणं एका विशेष कार्यक्रमात सिंदखेड राजा येथे सादर केलं आणि त्याला दादही चांगली मिळाली. पुढं महाविद्यालयात गेल्यावर कादंबरीकार व कथाकार प्रा. डॉ. मोहन पाटील सरांनी भीमरावच्या अंगी असलेले गुण हेरुन त्याला उत्तेजन दिलं. त्या काळात त्याच्या कविता अनुष्टुभ, लोकप्रभा आणि मराठीतल्या सकस साहित्यिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या. अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्याच्या कवितांना पारितोषिके मिळाली. त्याने लिहिलेल्या ‘बेअब्रू’, ‘मुक्ती’, ‘बळी’ अशा काही एकांकिकाही त्या काळात नाट्य चळवळीत भाव खाऊन गेल्या. ‘मोक्ष’ नावाची एकांकिका तर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत धडकून आली. लोकसंगीतातून त्याच्या अंगी भिनलेल्या कवितांनी आणि नाटकानं त्यांना विद्यार्थीदशेतंच चार पैसे मिळवून द्यायला सुरुवात केली. कुणाला मंगलाक्षता लिहून दे, कुठं गणपती उत्सवाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी स्क्रीप्ट लिहून दे, आकाशवाणीवर ‘प्रभातीचे रंग’ किंवा ‘घरोघरी’सारखी मालिका लिही... असं करता करता त्यांच्यातल्या साहित्यिकानं अलीकडेच सिनेमासाठीही गाणी लिहिली. एका स्थानिक दैनिकाच्या पुरवणीच्या संपादनाचं कामही त्यांनी काही काळ केलं. कौस्तुक देशपांडे, भालचंद्र डोंगरे, विनोद सन्मुख या कलाकार मित्रांच्या साहाय्याने गीतशील्प नावाचा वाद्यवृंद उभारण्याची कल्पनाही त्यानं सशक्तपणे अंमलात आणली.साहित्य क्षेत्रातील त्याची घोडदौड त्याच्या काव्यप्रतिभेमुळे थोरामोठ्यांची दाद मिळवत गेली. त्याने पु. ल. देशपांडे, विंदा, वसंत बापट, सुरेश भट, कृ . ब. निकुंब, पाडगावकर, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे, फ . मु. शिंदे, विठ्ठल वाघ अशा अनेकांच्या कौतुकाची थाप भीमरावला मिळाली. ‘कवडसे’ नावाचा एक काव्यसंग्रहही प्रकाशित झाला. पण या सगळ्यापेक्षा साहित्य क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सांगली - कोल्हापूर - सातारा - बेळगाव जिल्ह्यातल्या गावा-गावात उभारणाऱ्या साहित्य चळवळीला मोलाचा हातभार ठरली आहे. २००८ मध्ये सांगलीत झालेल्या साहित्य संमेलनातही तो एक कार्यकर्ता म्हणून तळमळीनं राबला. त्यांच्या या गुणांमुळंच सांगली, मिरजेतील अनेक सांस्कृतिक संस्थांतून ते क्रियाशील आहेत. शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठाचे तर ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ते संचालकही आहेत.वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. पण त्यावर चैतन्य मानेंसारख्या संवेदनशील कविमित्राने स्वतंत्र अकौन्टन्सीचे क्लासेस सुरु करण्यासाठी भीमरावला मदत केली आणि गेली २५ वर्षे एक उत्तम आणि संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थीप्रियताही संपादन केली. मध्यंतरी खासगी क्लासेसविरोधी शासनाने एक अध्यादेश जारी केला. तेव्हा बाळासाहेब लिमये सर, संजय कुलकर्णी, रवींद्र फडके आदी समव्यावसायिकांना एकत्र करुन भीमराव धुळूबुळूंनी संघटना बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या संघटनेचे जिल्हाध्यक्षपदही तीन वर्षे भूषविले. राज्य संघटनेचे सहकार्यवाहपदही भूषविले. एक संवेदनशील कवी, आदर्श शिक्षक, चोखंदळ संपादक, उत्कृष्ट वक्ता व सूत्रसंचालक असूनही, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या निर्मळ कार्यकर्त्याची भूमिका पार पाडताना भीमराव धुळुबूळू अधिक आनंदी असतात. वडिलांच्या शाहिरी परंपरेला उजाळा देण्यासाठी गेली आठ वर्षे ते त्यांच्या स्मृतिदिनी शाहिरांच्या मेळाव्याचे आयोजन करतात. अनेक रक्तदान शिबिरे, अनाथाश्रम व वृद्धाश्रमांचे उपक्रम आणि आपत्कालीन मदतकार्यात ते खारीचा वाटा उचलत असतात. - महेश कराडकर