शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ग्रामीण उद्योग वाढीसाठी अहवाल

By admin | Updated: July 27, 2014 23:58 IST

सुरेश पाटील : प्रत्येक जिल्ह्याला तीन कोटींची मागणी

सांगली : ग्रामीण उद्योग वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला असून, या सूचनांची अंमलबजावणी केल्यास वर्षाला सुमारे अडीच हजार उद्योजक तयार होतील, अशी माहिती राज्याचे खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात खादी ग्रामोद्योग महामंडळाने २३ जिल्ह्यांचा दौरा करुन बारा बलुतेदारांची, बचत गटांचे मेळावे घेतले. त्यानंतर राज्यात खादी ग्रामोद्योग वाढीसाठी काय उपाय योजना करता येतील, याचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. रोजगार वाढविण्यासाठी आपण बिनव्याजी परतफेड योजना, ग्रामीण कारागीर विकास योजना, सहकारी संस्थांचा विकास आदी विषयी उपाय सूचवले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला ३ ते ५ कोटींचा निधी दिल्यास प्रत्येक उद्योजकाला ५ ते ४० लाखांपर्यंतचे पाच वर्षासाठी कर्ज दिल्यास वर्षाला सुमारे अडीच हजार उद्योजक निर्माण होणार आहेत. बारा बलुतेदारांचा उद्योग करणाऱ्यांना पाच लाखांचे भांडवल दिल्यास पारंपरिक उद्योग टिकणार आहेत. त्यांना व्याजाचे अनुदान देण्याची मागणी आपण केली आहे. राज्य शासनाने ३३३ सोसायट्यांसाठी दिलेल्या ९८ कोटी ५९ लाखांचे कर्ज माफीची मागणी आपण केली आहे. कुंभार समाजासाठी माती बोर्ड स्थापन करुन त्यांना उद्योग पुरवणे यासाठी अभ्यास समिती आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. उद्योग वाढीसाठी लक्ष देणे गरजेचे असून, शासकीय दिरंगाईचा फटका सामान्यांना बसत आहे. आघाडी सरकारकडे असलेल्या कालावधित आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी आमची मागणी आहे. यावेळी आर. पी. बुचडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)