शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

योजनांमधून जनतेला दिलासा

By admin | Updated: October 18, 2016 00:56 IST

संजय पाटील : विटा येथे लाभार्थींना गॅस कनेक्शनचे वाटप

विटा : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेसाठी २७ योजना आणल्या. त्या योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार क्रांतिकारक निर्णय घेत असल्याचे प्रतिपादन खा. संजयकाका पाटील यांनी केले.विटा येथे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रमात खा. पाटील बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते.आ. अनिल बाबर म्हणाले, यापूर्वीही शासकीय योजनांचा लाभ मिळत होता. परंतु, त्याची टक्केवारी फारच कमी होती. मात्र आता शासकीय योजना थेट गरिबांच्या दारात पोहोविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशाच्या व जनतेच्या हिताच्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी, संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही चॅलेंज देऊ शकत नाही. त्यांचे काम सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या हिताचे आहे. त्यामुळेच गरिबांना आज खऱ्याअर्थाने न्याय मिळाला असल्याचे सांगितले.नगरसेवक अनिल म. बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी खा. पाटील, आ. बाबर, नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याहस्ते लाभार्थी महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सुहास पाटील, अ‍ॅड. विनोद गोसावी, दिग्विजय गॅसचे संजूकाका देशमुख, मोरया गॅसचे किशोर डोंबे, ऋषिकेश माने, विजय पाटील, सौ. शुभांगी कुलकर्णी, शंकर मोहिते, प्रताप सुतार यांच्यासह लाभार्थी महिला व नागरिक उपस्थित होते. अजित काळेबाग यांनी आभार मानले. (वार्ताहर)धाडसी निर्णय...खा. पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातले. देशाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले गेले, आजही घेत आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून लाभार्थी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन गृहिणींना मोठा आधार देण्याचे काम केले आहे. भाजप सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.विटा येथे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून लाभार्थी महिलांना खा. संजय पाटील यांच्याहस्ते मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष वैभव पाटील, संजूकाका देशमुख, किशोर डोंबे, नगरसेवक अनिल म. बाबर उपस्थित होते.