शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांची घरवापसी

By admin | Updated: May 19, 2015 00:27 IST

हंगाम उत्तम गेल्याने समाधान : गाठोड्यात सुख-दु:खे आणि मनात गावची ओढ घेऊन परतले

गजानन पाटील - संख -ऊस गळीत हंगाम संपल्याने जत तालुक्यातील ऊस तोडणी मजूर गावी परतू लागले आहेत. काही कारखाने वगळता बहुतांश कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. यावर्षी हंगाम चांगला झाला असल्याने मजुरांत समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी ३५ हजार मजुरांचे स्थलांतर झाले होते. त्यामुळे अनेक गावे ओस पडली होती. पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्यात जिरायत क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात जिरायत क्षेत्र ६९ हजार २९९ हेक्टर, तर बागायत क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर आहे. शेती लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे सहा महिने जगायचे कसे, असा प्रश्न या भागातील जनतेला कायम भेडसावत आहे. त्यातूनच ऊस तोडीसाठी येथील मजूर जात आहेत. तालुक्यातून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ३५ हजार मजूर स्थलांतर करतात. जिल्ह्यातील इस्लामपूर, वाळवा, शिराळा, कुंडल, कवठेमहांकाळ, कडेगाव, माधवनगर, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, चंदगड, गडहिंग्लज, कसबा बावडा, हातकणंगले, इचलकरंजी, वारणा, सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, रेठरे बुद्रुक, सातारा, फलटण, पाटण, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, तसेच कर्नाटकातील इंडी, चिक्कोडी, जमखंडी, उगार, निपाणी, अथणी, सावळगी आदी ठिकाणी ऊस तोडणीसाठी मजूर जातात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मजुरांना ऊस तोडणीचे काम करावे लागते. सध्या हंगाम संपला आहे. ज्या टोळीचा ऊस जास्त जातो, त्या टोळीला कारखाना बंद होण्याच्या दिवशी कारखान्याकडून बक्षिसे दिली जातात. नंबर आलेले ऊस तोडणी मजूर गावी परतताना ढोल, ताशांच्या गजरात, नारळाच्या झावळ्या गाडीला लावून गुलाल उधळत वाजत-गाजत गावी परतू लागले आहेत. काही गावांमध्ये जत्रेचे स्वरूप आले आहे. वाड्याचा व्यवसाय व ऊस तोडणीचा व्यवसायही यावर्षी चांगला झाला आहे, अशी चर्चा आहे.मजुरांच्या मागण्याकल्याणकारी महामंडळ स्थापन करा, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी, बोनस, पगारी रजा व वैद्यकीय लाभ आदी सुविधा द्या.ऊसतोडणी दर टनाला ३५० रुपये करा.प्रत्येकी तीन लाखाचा, ५० हजार रूपये वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीसह अपघाती विमा एका वर्षाचा लागू करा.अपघाती विमा व प्रिमियम सरकारने व कारखान्यांनी भरावा.