शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

प्रादेशिक योजना बनल्या पांढरा हत्ती

By admin | Updated: January 17, 2016 00:37 IST

ताळमेळ जुळेना : पाणीपट्टी दीड कोटींची; खर्च पाच कोटींवर

दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव तालुक्यातील ३१ गावांचा चार प्रादेशिक योजनांत समावेश आहे. या योजनेवर अवलंबून गावांची पाणीपट्टीची वार्षिक मागणी १ कोटी ४६ लाख रुपयांची आहे. या योजनेवर होणारा प्रत्यक्षात खर्च ५ कोटी २० लाखांवर आहे. कालबाह्य होत असलेल्या पाणी योजनांचा वाढत जाणारा खर्च, दिवसेंदिवस या योजनेतून बाहेर पडणाऱ्या गावांची संख्या यामुळे या योजनांची अवस्था पांढऱ्या हत्तीसारखी झाली असून, या योजना पोसायच्या कशा? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. तासगाव तालुक्यातील गावांचा समावेश असणाऱ्या चार प्रादेशिक योजनांपैकी मणेराजुरी प्रादेशिक योजनेत २४ गावांचा समावेश आहे. विसापूर-कवठेमहांकाळ योजनेत १७, येळावी योजनेत १०, पेड योजनेत ५ गावांचा समावेश आहे. त्यापैकी या योजनेत तासगाव तालुक्यातील ३१ गावांचा समावेश आहे. या पाणी योजनांच्या पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न गंभीर आहेच. किंंबहुना शंभर टक्के पाणीपट्टी वसुली झाली तरीही प्रादेशिक योजनेचा प्रश्न मार्गी लागणार नसल्याचे चित्र आहे. या चारही योजनांची शंभर टक्के पाणीपट्टी वसूल झालीच, तर सुमारे १ कोटी १० लाख रुपये होतात. मात्र या योजनेचे वीज, कामगार खर्च, देखभाल दुरुस्तीचा खर्च ५ कोटींवर आहे. त्यामुळे प्रादेशिकच्या येणाऱ्या रकमेचा पाचपट अधिक खर्च पाणी योजनांवर होत आहे. त्यामुळेच प्रादेशिक योजनांचा पांढरा हत्ती कोण पोसणार? असाच प्रश्न उपस्थित होत असून, या योजनांचे भवितव्य अंध:कारमय असल्याचेच दिसून येत आहे. बहुतांश प्रादेशिक पाणी योजना कालबाह्य झालेल्या आहेत. अपवाद वगळता बहुतांश गावांत पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियमित पाणी पुरवठा होत नाही. सर्वच नळकनेक्शन धारकांना पाणी मिळत नाही, अशा तक्रारी करत अनेक नागरिक पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करत आहेत. गाव कारभाऱ्यांच्या ऊदासीन भूमिकेमुळेही अनेक गावाची शंभर टक्के पाणीपट्टी वसूल होत नाही. पाणीपट्टी वसुलीसाठी गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी काही महिन्यांपुर्वी लोकअदालत घेतली होती. थकबाकीदार नळकनेक्शनधारकांना पाणीपट्टी वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही गावांतून प्रतिसाद मिळाला. मात्र पंचायत समितीच्या कारभाऱ्यांच्या ऊदासीन भूमिकेमुळे शंभर टक्के वसुलीचे चित्र दिसून आले नाही. काही गावांनी एकत्रित येऊन शंभर टक्के पाणीपट्टी वसूल केली. मात्र बड्या गावांनी पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. वीज बिल थकबाकी : वर्षात कोटीवर प्रादेशिक पाणी योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांपैकी काही गावांचा अपवाद सोडल्यास, बहुतांश गावांची शंभर टक्के पाणीपट्टी वसुली झाल्याचे दिसून येत नाही. गावातील कारभाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय यंत्रणेचा गाफीलपणा यामुळे थकित रकमेचा आकडाही कोटींच्या घरात आहे. अशातच पाणी योजनेच्या जमा-खर्चाचा ताळमेळ आवाक्याबाहेरचा ठरत असल्यामुळे वीज बिलाची वर्षाला किमान एक कोटींची रक्कम थकित राहिलेली आहे. २००२ पासून आतापर्यंत वीजबिलाची तब्बल १५ कोटींची रक्कम थकित आहे.