शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

जिल्ह्यातील नगरपालिकांकडे १३ कोटी रुपयांची वसुली प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST

सांगली : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या लेखापरीक्षणात अनियमितता हा विषय तब्बल ७० वर्षांपासून सुरू आहे. सांगली, मिरज नगरपालिकेच्या कारभारात ९३ लाखांचा ...

सांगली : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या लेखापरीक्षणात अनियमितता हा विषय तब्बल ७० वर्षांपासून सुरू आहे. सांगली, मिरज नगरपालिकेच्या कारभारात ९३ लाखांचा अधिभार निश्चित केला होता. जत नगरपालिकेकडे सर्वाधिक १२ कोटी रुपयांची अनियमितता उघड झाली होती. लेखापरीक्षणातील या अनियमिततेचा ठपका असलेल्या १३ कोटी रुपयांची वसुली अद्यापही प्रलंबित आहे.

नगरपालिकांच्या कारभाराचे वर्षाला लेखापरीक्षण होते. यात नियमाला डावलून दिलेल्या बिलांत अनियमितता दिसून आल्यास ही रक्कम भार-अधिभार म्हणून गणली जाते. त्या रकमेची वसुली नगरसेवक, अधिकाऱ्यांकडून केली जाते. हा प्रकार गेल्या ७० वर्षांपासून सुरू आहे. तत्कालीन सांगली नगरपालिकेकडील १२ प्रकरणांमधील ३५ लाख २४ हजार रुपयांची अनियमितता होती. ही अनियमितता १९४९ ते १९९२ या कालावधीतील आहे. मिरज नगरपरिषदेकडे १९४८-४९ या कालावधीतील ८५७ रुपये, १९५५-५६ मधील ६३ रुपये, १९५८-५९ मधील ४६ लाख ९३ हजार, १९८८ ते ९१ मधील १ लाख ९२ हजार रुपये, १९९१ ते ९३ मधील ७ लाख ६६ हजार भार-अधिभार रक्‍कम प्रलंबित आहे. आष्टा नगरपालिकेकडे १९६१ ते ६२ मधील १ हजार ९६२, १९९० ते ९२ मधील ६२ हजार ३८४ रुपये, इस्लामपूर नगरपालिकेकडे १९७६ ते ८० मधील १ लाख ९२ हजार रुपये, तर तासगाव नगरपालिकेकडील १९९० ते ९२ च्या लेखापरीक्षणातील ४५ हजार ८२६, जत नगरपालिकेकडील २०१७-१८ मधील १२ कोटी १२ लाख रुपये भार-अधिभार रक्कम प्रलंबित आहे. पलूस नगरपरिषदेकडेही ४८ हजार रुपयांची अनियमिता उघड झाली होती.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे म्हणाले, तत्कालीन सांगली नगरपालिकेच्या लेखापरीक्षणातील अनियमितता उघड झाल्यानंतर रक्कम वसुलीसाठी मी कित्येक वर्षे झगडत होतो. महापालिकेच्या २००६ ते २०१५ या कालावधीतील विशेष लेखापरीक्षणातील दीड हजार कोटींची रक्कम वसूलपात्र आहे. नगरपालिकांकडील भार-अधिभार वसुली ७० वर्षांनंतरही होऊ शकली नाही. महापालिकेच्या भार-अधिभार वसुलीला किती वर्षे लागणार? असा सवाल केला.

चौकट

मुख्याधिकाऱ्यांना पत्र

संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रादेशिक उपसंचालक (नगरपालिका प्रशासन) यांनी पत्र पाठविले आहे. स्थानिक निधी लेखा विभागाने दिलेली प्रलंबित भार-अधिभार प्रकरणे व रकमांची माहिती कार्यालयीन कागदपत्रांवरून तपासून बरोबर असल्याबाबतची खात्री करावी. काही प्रकरणे निकाली निघाली असल्यास त्याबाबत पुराव्यासह माहिती सादर करावी, असे पत्रात म्हटले आहे.