शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई पुन्हा रखडली

By admin | Updated: November 2, 2014 23:30 IST

मिरजेतील प्रकार : पावसाने जुन्या इमारतींची दुरवस्था; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली

सदानंद औंधे - मिरज -पावसाने जुन्या इमारतींची पडझड सुरू असतानाच महापालिकेचे जुन्या धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष आहे. मिरजेत केवळ १७ धोकादायक इमारतींना केवळ नोटिसा बजावून महापालिकेच्या बांधकाम विभागाने हात झटकले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबई येथील इमारत दुर्घटनेनंतर महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. ४० जुन्या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई रखडली आहे. मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्यानंतर नगरविकास विभागाने बेकायदा व धोकादायक इमारतींवर कारवाईसाठी प्रत्येक महापालिकेला स्वतंत्र पथकाच्या निर्मितीचे आदेश दिले. त्यानुसार पाच महिन्यांपूर्वी तत्कालीन उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकात सहाय्यक नगररचनाकार, शाखा अभियंता, इमारत निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, ३७ बीट मुकादम, १७ मुकादम आदी ५० जणांचा समावेश करण्यात आला. या पथकाने यापूर्वी नोटिसा बजावण्यात आलेल्या सांगली-मिरजेतील काही जुन्या इमारती पाडल्या. या जुन्या इमारती पाडण्याच्या कारवाईचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. जुन्या इमारती पाडण्यास विरोध करणारा घरमालक किंवा भाडेकरुवर फौजदारी कारवाईचे व धोकादायक इमारती पाडण्याचाही खर्च संबंधित मालकाकडून वसूल करण्याचे महापालिकेस अधिकार आहेत. धोकादायक इमारती व अवैध बांधकामांची माहिती देण्याचे काम बीट मुकादम व स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आले आहे. अवैध व धोकादायक इमारतींची त्यांनी माहिती दिली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. महापालिका हद्दीतील धोकादायक इमारती भुईसपाट केल्यानंतर अतिक्रमणे हटविण्याचे व पाडण्याचे काम स्वतंत्र पथक करणार असल्याचीही घोषणा झाली. मिरजेतील १७ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या. त्याही इमारती जमीनदोस्त करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र मिरजेत धोकादायक इमारतींवर कारवाई होऊ नये यासाठी राजकीय दबाव असल्याने धोकादायक इमारतीवरील कारवाई थांबली असल्याची माहिती मिळाली. खरोखर कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष करून घरमालक-भाडेकरू वाद सुरू असलेल्या ठिकाणी अनावश्यक इमारत पाडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत. दोन ठिकाणी जुन्या घरांच्या भिंती कोसळून साहित्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जुन्या इमारती कोसळण्याची भीती कायम आहे. बांधकाम विभागाच्या सबबी धोकादायक बांधकामे पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळवावा लागतो. इमारती पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. अनेक जुन्या इमारतींचे मालक कारवाईविरोधात न्यायालयात गेले असल्याने धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई थांबल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.