शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

‘टेंभू’च्या टप्प्यासाठी चळवळ उभारा

By admin | Updated: May 3, 2017 23:26 IST

एन. डी. पाटील : करंजेत उद्घाटन समारंभ; घाटमाथ्याचा पाणीप्रश्न मिटवा

खानापूर : खानापूर घाटमाथ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी टेंभू योजनेचा लाभ लवकर मिळणे गरजेचे आहे. यासाठी चौथा, पाचवा टप्पा त्वरित कार्यान्वित झाला पाहिजे. आमदार अनिल बाबर यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु वेळ पडली तर लोकचळवळ उभारून आमदारांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन्. डी. पाटील यांनी करंजे (ता. खानापूर) येथे केले. करंजे (ता. खानापूर) येथील भीमरावतात्या सूर्यवंशी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ व संगणकीय प्रणालीचा प्रारंभ प्रा. डॉ. पाटील यांच्याहस्ते झाला, याप्रसंगी ते बोलत होते. आ. गणपतराव देशमुख, आ. मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष गजानन शेटे उपस्थित होते. प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, सध्या सहकार मोडीत निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग उद्ध्वस्तच होत चालला आहे. सहकार जिवंत राहणे गरजेचे आहे. तरच शेती आणि शेतकरी वाचणार आहे. आ. कदम म्हणाले, घाटमाथ्याचा पाणीप्रश्न लवकर सुटला पाहिजे. तरच येथील शेतकरी, जनता सुखी होणार आहे. टेंभूसाठी आम्ही सर्वजण पक्षविरहित काम करत आहोत. आ. बाबर म्हणाले की, खानापूर घाटमाथ्याचा यावर्षीचा दुष्काळ शेवटचाच ठरणार आहे. त्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. भीमराव तात्या पतसंस्थेकडे तात्यांच्या विचारांचे स्मारक म्हणूनच पाहिले जाईल. याप्रसंगी बाजार समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, राजेश कदम, सुभाष पाटील, प्राचार्य सुरेश साळुंखे, प्रा. बाबूराव लगारे, सारिका माने, राजेंद्र शिंदे, सदाशिव हसबे, राजाभाऊ शिंदे, गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, उत्तमराव सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, सुभाष गायकवाड, संभाजी जाधव, संभाजी जाधव, गजानन शेटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तुकाराम यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)