शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

‘टेंभू’च्या टप्प्यासाठी चळवळ उभारा

By admin | Updated: May 3, 2017 23:26 IST

एन. डी. पाटील : करंजेत उद्घाटन समारंभ; घाटमाथ्याचा पाणीप्रश्न मिटवा

खानापूर : खानापूर घाटमाथ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी टेंभू योजनेचा लाभ लवकर मिळणे गरजेचे आहे. यासाठी चौथा, पाचवा टप्पा त्वरित कार्यान्वित झाला पाहिजे. आमदार अनिल बाबर यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु वेळ पडली तर लोकचळवळ उभारून आमदारांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन्. डी. पाटील यांनी करंजे (ता. खानापूर) येथे केले. करंजे (ता. खानापूर) येथील भीमरावतात्या सूर्यवंशी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ व संगणकीय प्रणालीचा प्रारंभ प्रा. डॉ. पाटील यांच्याहस्ते झाला, याप्रसंगी ते बोलत होते. आ. गणपतराव देशमुख, आ. मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष गजानन शेटे उपस्थित होते. प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, सध्या सहकार मोडीत निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग उद्ध्वस्तच होत चालला आहे. सहकार जिवंत राहणे गरजेचे आहे. तरच शेती आणि शेतकरी वाचणार आहे. आ. कदम म्हणाले, घाटमाथ्याचा पाणीप्रश्न लवकर सुटला पाहिजे. तरच येथील शेतकरी, जनता सुखी होणार आहे. टेंभूसाठी आम्ही सर्वजण पक्षविरहित काम करत आहोत. आ. बाबर म्हणाले की, खानापूर घाटमाथ्याचा यावर्षीचा दुष्काळ शेवटचाच ठरणार आहे. त्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. भीमराव तात्या पतसंस्थेकडे तात्यांच्या विचारांचे स्मारक म्हणूनच पाहिले जाईल. याप्रसंगी बाजार समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, राजेश कदम, सुभाष पाटील, प्राचार्य सुरेश साळुंखे, प्रा. बाबूराव लगारे, सारिका माने, राजेंद्र शिंदे, सदाशिव हसबे, राजाभाऊ शिंदे, गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, उत्तमराव सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, सुभाष गायकवाड, संभाजी जाधव, संभाजी जाधव, गजानन शेटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तुकाराम यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)