शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘टेंभू’च्या टप्प्यासाठी चळवळ उभारा

By admin | Updated: May 3, 2017 23:26 IST

एन. डी. पाटील : करंजेत उद्घाटन समारंभ; घाटमाथ्याचा पाणीप्रश्न मिटवा

खानापूर : खानापूर घाटमाथ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी टेंभू योजनेचा लाभ लवकर मिळणे गरजेचे आहे. यासाठी चौथा, पाचवा टप्पा त्वरित कार्यान्वित झाला पाहिजे. आमदार अनिल बाबर यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु वेळ पडली तर लोकचळवळ उभारून आमदारांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन्. डी. पाटील यांनी करंजे (ता. खानापूर) येथे केले. करंजे (ता. खानापूर) येथील भीमरावतात्या सूर्यवंशी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ व संगणकीय प्रणालीचा प्रारंभ प्रा. डॉ. पाटील यांच्याहस्ते झाला, याप्रसंगी ते बोलत होते. आ. गणपतराव देशमुख, आ. मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी, उपाध्यक्ष गजानन शेटे उपस्थित होते. प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, सध्या सहकार मोडीत निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग उद्ध्वस्तच होत चालला आहे. सहकार जिवंत राहणे गरजेचे आहे. तरच शेती आणि शेतकरी वाचणार आहे. आ. कदम म्हणाले, घाटमाथ्याचा पाणीप्रश्न लवकर सुटला पाहिजे. तरच येथील शेतकरी, जनता सुखी होणार आहे. टेंभूसाठी आम्ही सर्वजण पक्षविरहित काम करत आहोत. आ. बाबर म्हणाले की, खानापूर घाटमाथ्याचा यावर्षीचा दुष्काळ शेवटचाच ठरणार आहे. त्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. भीमराव तात्या पतसंस्थेकडे तात्यांच्या विचारांचे स्मारक म्हणूनच पाहिले जाईल. याप्रसंगी बाजार समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, राजेश कदम, सुभाष पाटील, प्राचार्य सुरेश साळुंखे, प्रा. बाबूराव लगारे, सारिका माने, राजेंद्र शिंदे, सदाशिव हसबे, राजाभाऊ शिंदे, गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, उत्तमराव सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, सुभाष गायकवाड, संभाजी जाधव, संभाजी जाधव, गजानन शेटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तुकाराम यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)