शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

पावसाळ्यात सांगलीकरांना अशुद्ध पाणी

By admin | Updated: May 12, 2016 00:17 IST

जलशुद्धीकरणाचे काम अपूर्ण : दुरुस्तीच्या नावाखाली खेळखंडोबा; आरोग्याची चिंता कायम...

सांगली : महापालिकेकडून सांगलीकरांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन प्रत्येकवेळी दिले जाते. शुद्धीकरण यंत्रणेवर आता कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू आहे. पण यंदाच्या पावसाळ्यात सांगलीकरांच्या नशिबी अशुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरूस्तीचे काम अपूर्ण आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात त्यातील एकही काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने दुरुस्तीच्या नावाखाली कामाचा खेळखंडोबा केला आहे. महापालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा होतो. १९८६ पासून माळबंगला येथे ३६ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे शुद्धीकरण प्लँट आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. ३६ एमएलडीवरून ५६ एमएलडी क्षमता केली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली तीस वर्षे पाण्याची गढुळता कमी करण्यासाठी फक्त तुरटीचाच वापर होत होता. पावसाळ्यात तुरटी व पीएसी पावडरचा वापर करून गढुळता कमी केली जाते. यंदा मात्र पावसाळ्यात नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. कारण जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असून दोन वर्षात एकही काम पूर्ण झालेले नाही. माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तेथील त्रुटींवर बोट ठेवले आहे. ५६ एमएलडी शुद्धीकरण यंत्रणेतील इरिगेशन फौंटनचे काम अर्धवट आहे. प्लॅश मिक्शर पूर्वी होता तो आता अस्तित्वातच नाही. दोन्ही क्लॉरिफायमध्ये गाळ साचलेला असून एक क्लॉरिफाय स्लॅबचे पत्रे, लाकडी साहित्य व लोखंडी सळयांनी भरलेला आहे. दोन्ही क्लॉरिफायमध्ये ब्रीज चालू नाही. ड्रेन हॉलचे बांधकाम व्यवस्थित चालू नाही. एक ड्रेन हॉल बंद आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील चार फिल्टर बेडपैकी एक बेड दुरुस्तीसाठी वर्षभर बंद आहे. त्यामुळे जादा झालेले पाणी बायपासने सोडावे लागते. क्लोरीनसाठी खोली बांधून तयार आहे, पण या खोलीत ठेकेदाराने इतर साहित्य भरून ठेवले आहे. त्यामुळे क्लोरीनची पोती उघड्यावर टाकण्यात आली आहेत. सध्या नादुरुस्त प्लँटमधून क्लोरीन वापरले जात आहे. त्याकडेही कोणाचे लक्ष नाही. एकूणच जलशुद्धीकरण केंद्राचे आरोग्य बिघडल्याने पावसाळ्यात नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची चिंता आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचा उठाव : कार्यकारी अभियंत्यांना पत्रमाळ बंगला जलशुद्धीकरण केंद्राकडील १३ कर्मचाऱ्यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना पत्र पाठवून तेथील त्रुटींवर बोट ठेवले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. इरिगेशन, फौंटन व ब्रीजवर विद्युत व्यवस्था नाही. वॉश वॉटर टाकी व क्लोरीन खोलीतील दिवे बंद आहेत. अशा स्थितीत कामगार जीव मुठीत धरून रात्रंदिवस काम करीत आहेत. शुद्धीकरण प्रक्रियेतील यंत्रणाच सुरू नसल्याने पावसाळ्यात शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.दहा वर्षे बेडची वाळूच बदललेली नाही जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमधील बेडची वाळू गेली दहा वर्षे बदलण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी पाण्याला दुर्गंधी सुटली होती. त्यावरून पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरण्यात आले होते. त्यानंतर गुजरातहून वाळू मागविण्यात आली. पण वर्षभर ही वाळू आवारातच पडून आहे.