शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सांगलीकरांना अशुद्ध पाणी

By admin | Updated: May 12, 2016 00:17 IST

जलशुद्धीकरणाचे काम अपूर्ण : दुरुस्तीच्या नावाखाली खेळखंडोबा; आरोग्याची चिंता कायम...

सांगली : महापालिकेकडून सांगलीकरांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन प्रत्येकवेळी दिले जाते. शुद्धीकरण यंत्रणेवर आता कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू आहे. पण यंदाच्या पावसाळ्यात सांगलीकरांच्या नशिबी अशुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरूस्तीचे काम अपूर्ण आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात त्यातील एकही काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने दुरुस्तीच्या नावाखाली कामाचा खेळखंडोबा केला आहे. महापालिकेच्या माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा होतो. १९८६ पासून माळबंगला येथे ३६ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे शुद्धीकरण प्लँट आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. ३६ एमएलडीवरून ५६ एमएलडी क्षमता केली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली तीस वर्षे पाण्याची गढुळता कमी करण्यासाठी फक्त तुरटीचाच वापर होत होता. पावसाळ्यात तुरटी व पीएसी पावडरचा वापर करून गढुळता कमी केली जाते. यंदा मात्र पावसाळ्यात नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. कारण जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असून दोन वर्षात एकही काम पूर्ण झालेले नाही. माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तेथील त्रुटींवर बोट ठेवले आहे. ५६ एमएलडी शुद्धीकरण यंत्रणेतील इरिगेशन फौंटनचे काम अर्धवट आहे. प्लॅश मिक्शर पूर्वी होता तो आता अस्तित्वातच नाही. दोन्ही क्लॉरिफायमध्ये गाळ साचलेला असून एक क्लॉरिफाय स्लॅबचे पत्रे, लाकडी साहित्य व लोखंडी सळयांनी भरलेला आहे. दोन्ही क्लॉरिफायमध्ये ब्रीज चालू नाही. ड्रेन हॉलचे बांधकाम व्यवस्थित चालू नाही. एक ड्रेन हॉल बंद आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील चार फिल्टर बेडपैकी एक बेड दुरुस्तीसाठी वर्षभर बंद आहे. त्यामुळे जादा झालेले पाणी बायपासने सोडावे लागते. क्लोरीनसाठी खोली बांधून तयार आहे, पण या खोलीत ठेकेदाराने इतर साहित्य भरून ठेवले आहे. त्यामुळे क्लोरीनची पोती उघड्यावर टाकण्यात आली आहेत. सध्या नादुरुस्त प्लँटमधून क्लोरीन वापरले जात आहे. त्याकडेही कोणाचे लक्ष नाही. एकूणच जलशुद्धीकरण केंद्राचे आरोग्य बिघडल्याने पावसाळ्यात नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची चिंता आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचा उठाव : कार्यकारी अभियंत्यांना पत्रमाळ बंगला जलशुद्धीकरण केंद्राकडील १३ कर्मचाऱ्यांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना पत्र पाठवून तेथील त्रुटींवर बोट ठेवले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. इरिगेशन, फौंटन व ब्रीजवर विद्युत व्यवस्था नाही. वॉश वॉटर टाकी व क्लोरीन खोलीतील दिवे बंद आहेत. अशा स्थितीत कामगार जीव मुठीत धरून रात्रंदिवस काम करीत आहेत. शुद्धीकरण प्रक्रियेतील यंत्रणाच सुरू नसल्याने पावसाळ्यात शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.दहा वर्षे बेडची वाळूच बदललेली नाही जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमधील बेडची वाळू गेली दहा वर्षे बदलण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी पाण्याला दुर्गंधी सुटली होती. त्यावरून पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरण्यात आले होते. त्यानंतर गुजरातहून वाळू मागविण्यात आली. पण वर्षभर ही वाळू आवारातच पडून आहे.