शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सांगली शहरासह मिरज तालुक्यात पावसाने सांगलीकरांची दैना

By admin | Updated: September 23, 2014 23:59 IST

द्राक्षबागायतदार चिंतेत : मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊस

सांगली : सांगली शहरासह मिरज तालुक्यात आज (मंगळवार) पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. सांगलीतील मारुती चौक, जुन्या स्टेशन रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिले होते. दुपारपर्यंत हे पाणी तसेच होते. महापालिका परिसरातही दलदलीमुळे गैरसोय झाली. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील निर्यात द्राक्षबागायतदार चिंतेत सापडला आहे.सकाळी चार तासात मिरज तालुक्यात २४ मिलिमीटर पाऊस झाला. सांगली शहरात पहाटे दोनपासून पावसाने सुरुवात केली होती. मुसळधार पावसामुळे मारुती चौक, शिवाजी मंडई, स्टेशन रस्त्यावर, गुंठेवारी भागात पाणी साचून राहिले होते. गटारी तुंबल्यामुळे स्टेशन रस्त्यावर दुपारपर्यंत पाणी तसेच राहिल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली. पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधानाचे वातावरण आहे. परंतु, महिनाभर पावसाने उघडीपच न दिल्यामुळे मिरज, वाळवा, पलूस तालुक्यातील सखल भागातील शेतीत पाणी साचून राहिले आहे. त्यातच मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे प्रमाण जास्त आहे. या भागामध्ये पडलेल्या पावसामुळे आॅगस्ट महिन्यात छाटणी झालेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. आठवडाभरात दोन दिवस पाऊस, तर दोन दिवस ढगाळ हवामान आहे. हे वातावरण आणि पावसामुळे द्राक्षबागांमध्ये दावण्या, करपा, थ्रीप्स अशा रोगांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे येथील द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला गुंठेवारीचा अनुभवमहापालिका क्षेत्रात तब्बल ४0 हजार घरे गुंठेवारीत असून लाखो लोकांना गुंठेवारीचा वनवास भोगावा लागतो. गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारीतील लोक सुविधांपासून वंचितच आहेत. नियमितीकरणासाठी पैसे भरूनही त्यांच्या वाट्याचे दुखणे कमी झालेले नाही. गुंठेवारी नागरिकांनी कितीही ओरड केली तरी ती महापालिकेच्या मुख्यालयात कधी पोहोचत नाही. त्यामुळे गुंठेवारीतील सुविधांचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. महापालिकेच्या मुख्यालय आवारात सध्या सुशोभिकरणासाठी खुदाई केली आहे. संपूर्ण आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवायचे असल्याने ही खुदाई केली होती. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने याठिकाणी घोट्यापर्यंत चिखल साचला. ड्युटीवर आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवारातील ही दलदल पाहून धक्का बसला. वाहनेही आत जात नव्हती. काहींनी दूर वाहने लावून चिखलातून मार्ग काढतच कार्यालय गाठले.