शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी विद्यापीठातर्फे शेटफळेत कृषी पारायणाचे आयाेजन : पी. जी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST

आटपाडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण दिवस राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची ...

आटपाडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण दिवस राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरुवात आटपाडी तालुक्यातील थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मगाव शेटफळेपासून करण्यात येणार असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र एकूण दहा जिल्ह्यांमध्ये आहे. या दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण आयोजित करण्यात येणार आहे. संशोधन केंद्र, विज्ञान केंद्र, विभागीय विस्तार केंद्रे, जिल्हा विस्तार केंद्रे यांच्या सहभागातून कृषी पारायण उपक्रम राबविला जाणार आहे. शासनाचे कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. राज्यात प्रथमच असा तंत्रज्ञान प्रसाराचा शेतकरीभिमुख कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

दरम्यान, कृषी पारायण संकल्पनेची सुरुवात आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे थोर साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मभूमीतून करण्यात येणार आहे. दि. २१ सप्टेंबरला शेटफळे येथे डॉ. अनिल दुरुगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. प्रकाश मोरे या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भेट देत शेटफळे परिसरात आलेल्या मर रोगाविषयी मार्गदर्शन केले हाेते.

चौकट

असा असेल उपक्रम

कृषी पारायणामध्ये जिल्ह्यातील एका गावाची निवड केली जाणार आहे. त्या गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत त्यांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मातीचे आरोग्य, पाण्याचा वापर, सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन, शेती उत्पादन कसे वाढवता येईल, स्मार्ट शेती, रासायनिक खतांचा समतोल, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, स्थानिक हवामानानुसार शेती सल्ला यासह जनावरांसाठी चारा व्यवस्थापन, मुक्त गोठा पद्धत, मुरघास तंत्रज्ञान, शेळीपालन तंत्रज्ञान यासह अन्य विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

काेट

राज्यात प्रथमच कृषी पारायण संकल्पना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून राबविली जात आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शास्त्रीय ज्ञान मिळेल व त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ