शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

राहुरी विद्यापीठातर्फे शेटफळेत कृषी पारायणाचे आयाेजन : पी. जी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST

आटपाडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण दिवस राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची ...

आटपाडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण दिवस राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरुवात आटपाडी तालुक्यातील थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मगाव शेटफळेपासून करण्यात येणार असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र एकूण दहा जिल्ह्यांमध्ये आहे. या दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण आयोजित करण्यात येणार आहे. संशोधन केंद्र, विज्ञान केंद्र, विभागीय विस्तार केंद्रे, जिल्हा विस्तार केंद्रे यांच्या सहभागातून कृषी पारायण उपक्रम राबविला जाणार आहे. शासनाचे कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. राज्यात प्रथमच असा तंत्रज्ञान प्रसाराचा शेतकरीभिमुख कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

दरम्यान, कृषी पारायण संकल्पनेची सुरुवात आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे थोर साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मभूमीतून करण्यात येणार आहे. दि. २१ सप्टेंबरला शेटफळे येथे डॉ. अनिल दुरुगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. प्रकाश मोरे या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भेट देत शेटफळे परिसरात आलेल्या मर रोगाविषयी मार्गदर्शन केले हाेते.

चौकट

असा असेल उपक्रम

कृषी पारायणामध्ये जिल्ह्यातील एका गावाची निवड केली जाणार आहे. त्या गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत त्यांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मातीचे आरोग्य, पाण्याचा वापर, सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन, शेती उत्पादन कसे वाढवता येईल, स्मार्ट शेती, रासायनिक खतांचा समतोल, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, स्थानिक हवामानानुसार शेती सल्ला यासह जनावरांसाठी चारा व्यवस्थापन, मुक्त गोठा पद्धत, मुरघास तंत्रज्ञान, शेळीपालन तंत्रज्ञान यासह अन्य विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

काेट

राज्यात प्रथमच कृषी पारायण संकल्पना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून राबविली जात आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शास्त्रीय ज्ञान मिळेल व त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ