शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आभासी सुखासाठी शहरी भागाकडे ओढा

By admin | Updated: November 30, 2015 01:13 IST

रणधीर शिंदे : ‘बांडगूळ आख्यान’ कादंबरीवर सांगलीत चर्चासत्र

सांगली : वाढत्या अपेक्षांनी खेड्यातील जनतेचा शहराकडे वाढत चाललेला ओढा आणि त्यामुळे खेडी उद्ध्वस्त होत असताना, खेड्यात होणारा बदल अपरिहार्य आहे. गावाकडे आयुष्य काढलेल्यांनाही आता खेडी असुरक्षित वाटू लागल्याने गावांचा चेहरा हरवत चालला असून, आभासी सुखाच्या नादात खेड्यातील जनतेचा शहराकडे ओढा वाढत असल्याची खंत डॉ. रणधीर शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सांगली आणि मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोहन पाटील यांच्या ‘बांडगूळ आख्यान’ या कादंबरीवर आयोजित चर्चेत शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. तारा भवाळकर होत्या. डॉ. शिंदे पुढे म्हणाले, गाव, समाज तंत्र आणि सर्वच धोरणात बदल होत आहे. या बदलाचा आवाका समजून घेणे आवश्यक आहे. गावच्या जमिनी व निसर्ग संपत्तीवर बड्यांचा डोळा असल्याने खेडी बदलत आहेत. स्थानिक परंपरा नाहीशा होत असल्यानेही परिणाम दिसून येत आहे. आभासी सुखाच्या नादात गावाकडील लोक शहराकडे वळत असल्याचे सांगत मोहन पाटील यांनी ‘बांडगूळ आख्यान’ कादंबरीतून ग्रामीण भागातील चित्र प्रभावीपणे मांडल्याचेही त्यांनी सांगितले.ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन म्हणाले, ४६ टक्के जनता आता ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरित होत आहे अथवा विचारात आहे. मोठ्या अपेक्षेने शहाराच्या ओढीने चाललेल्या जनतेचे मन रमत नसल्याचे चित्र आहे. मोहन पाटील यांनी लिहिलेल्या या कादंबरीतून शहरी आणि ग्रामीण भाषेचा पट चांगल्या पध्दतीने मांडण्यात आलेला आहे. समकालीन मराठी साहित्यात महत्त्वाची कादंबरी म्हणूनही या कादंबरीचा उल्लेख व्हावा लागेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले. यावेळी प्रा. बापू जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, डॉ. अनिल मडके यांच्यासह साहित्य परिषदेच्या सांगली शाखेचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)