शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

चोऱ्या रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहीम

By admin | Updated: July 19, 2015 23:38 IST

पोलीसप्रमुखांचा निर्णय : पोलिसांची यंत्रणा आणखी सतर्क ठेवण्यासाठी प्रयत्न

सांगली : जिल्ह्यातील वाटमारी, चोरी, घरफोडी हे मालमत्ताविषयक गुन्हे रोखण्यासाठी प्रबोधनात्मक मोहीम उघडण्याचा निर्णय जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी घेतला आहे. त्याची सुरुवातही त्यांनी केली आहे. रात्र आणि दिवस अशा दोन सत्रात गस्त घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आणखी सतर्क करण्यात आली आहे. नागरिकांनीही खबरदारी घेतल्यास चोरीच्या घटना टळू शकतात, असे स्पष्ट मत फुलारी यांनी व्यक्त केले आहे.वाळवा, शिराळा व खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातही आठवड्यात दोन आलिशान बंगले फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाळवा, शिराळा तालुक्यात गावकरी गस्त घालण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. वाढत्या चोऱ्यांचा प्रश्न आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दखल घ्यावी लागली. गतवर्षीच्या तुलनेत चोऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी, गेल्या महिन्याभरात सातत्याने चोरीचे गुन्हे घडतच आहेत. नवीन गुन्हेगारांचे रेकॉर्ड नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण बनले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील व परराज्यातील गुन्हेगारांनी येथे शिरकाव केला आहे. या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. दररोज गस्त सुरु असूनही अद्याप संशयित कोणीही सापडलेले नाही. (प्रतिनिधी) (समाप्त)मदत घेऊनच गस्त घालावीग्रामीण गस्त घालणारे गावकऱ्यांकडून चोर समजूृन संशयावरुन मारहाण केली जात आहे. पण पोलीस चौकशीत पकडलेला संशयित चोर नसल्याचे निष्पन्न होत आहे. यासंदर्भात फुलारी म्हणाले, गस्त घालताना गावकऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस व गावच्या पोलीस पाटीलची मदत घ्यावी. संशय वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मारहाणीतून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत जून, जुलैमध्ये चोऱ्यांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. चोरांचा धुमाकूळ सुरू असल्याने लोक गस्त घालत असले तरी, आमचे पोलीसही त्यांच्या मदतीसाठी आहेत. घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा सक्षम आहे. चोरीचे गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्कता बाळगायला हवी. - सुनील फुलारी, जिल्हा पोलीसप्रमुख