शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरची बारामती करणारा नगराध्यक्ष हवा

By admin | Updated: July 28, 2016 00:58 IST

पालिका निवडणूक : जयंतराव पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान

अशोक पाटील -- इस्लामपूर  -एम. डी. पवार यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर पाटील पार्टी, नागरिक संघटना आणि आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून इस्लामपूर शहरात विकासाची गंगा आणल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी करत आहे. तसेच प्रत्येक पालिका निवडणुकीत इस्लामपूरची बारामती करण्याची घोषणा आमदार जयंत पाटील यांच्याकडून होत असते. परंतु सत्तेवर येणाऱ्या नेत्यांनी शहराचा विकास न करता स्वत:चाच विकास केला असल्याचाही आरोप विरोधकांकडून वेळोवेळी केला गेला आहे. त्यामुळे आगामी काळातील नगराध्यक्ष हा इस्लामपूरची बारामती करणारा असावा, अशी अपेक्षा इस्लामपूरकरांनी व्यक्त केली आहे.गेली ३0 वर्षे पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरातील एखाद्या विकास कामाच्या उद्घाटनाला सिनेअभिनेत्यांची गर्दी करुन, इस्लामपूरची बारामती करू, अशा वल्गना केल्या गेल्या आहेत. पण शहराचा विकास पाहता, रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि शहराचा विकास आराखडा या मूलभूत सुविधांपासून सर्वसामान्य जनता वंचित आहे. २४ तास पाणी देण्याची घोषणा हवेत विरली असून काही प्रभागात पाणी पुरवठाच होत नाही. शहरातील झालेली रस्त्यांची कामे पहिल्याच पावसात धुऊन गेली आहेत. तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याने डासांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. अलीकडील सहा महिन्यात औषध फवारणी झाल्याचे दिसत नाही.गत पावसाळ्यात झाडे लावलेल्या खड्ड्यांतच यावर्षीही पुन्हा एकदा झाडे लावण्याचा फार्स पालिकेने केला आहे. लघुशंकेसाठी शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेली स्वच्छतागृहे अज्ञातांनी काढून टाकली आहेत. ज्यांच्या व्यापारी संकुलनाच्या आसपास स्वच्छतागृहे होती, त्या मालकांनीच ती काढून टाकली आहेत. त्यांना काही नगरसेवकांचा पाठिंबा असल्यानेच त्यांच्याकडून हे कृत्य झाले आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच जेथे स्वच्छतागृहे आहेत, तेथील लोक त्याचा शौचालयासाठी वापर करत आहेत. या प्रकाराला किमान २ ते ३ महिन्यांचा कालावधी लोटला असून, पालिकेच्यावतीने मात्र कसलीही कार्यवाही झालेली नाही.बारामती पाहिल्यानंतर, शहराचा विकास करताना काय काय करता येऊ शकते हे दिसते. यामुळेच माजी मंत्री, आमदार जयंत पाटील नेहमीच नेते शरद पवार यांचे गोडवे गात इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी शहरातील नागरिकांसमोर मते मागण्यासाठी जाताना, शहराची बारामती करण्याचा पहिला मुद्दा असतो. परंतु निवडणूक झाल्यानंतर दिलेली सर्व आश्वासने सत्ताधारी आपसूकच विसरुन गेलेले असतात. खरोखरच जयंत पाटील यांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास जनतेने इस्लामपूरची बारामती करणारा नगराध्यक्ष निवडावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.