शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

इस्लामपूरची बारामती करणारा नगराध्यक्ष हवा

By admin | Updated: July 28, 2016 00:58 IST

पालिका निवडणूक : जयंतराव पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान

अशोक पाटील -- इस्लामपूर  -एम. डी. पवार यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर पाटील पार्टी, नागरिक संघटना आणि आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून इस्लामपूर शहरात विकासाची गंगा आणल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी करत आहे. तसेच प्रत्येक पालिका निवडणुकीत इस्लामपूरची बारामती करण्याची घोषणा आमदार जयंत पाटील यांच्याकडून होत असते. परंतु सत्तेवर येणाऱ्या नेत्यांनी शहराचा विकास न करता स्वत:चाच विकास केला असल्याचाही आरोप विरोधकांकडून वेळोवेळी केला गेला आहे. त्यामुळे आगामी काळातील नगराध्यक्ष हा इस्लामपूरची बारामती करणारा असावा, अशी अपेक्षा इस्लामपूरकरांनी व्यक्त केली आहे.गेली ३0 वर्षे पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरातील एखाद्या विकास कामाच्या उद्घाटनाला सिनेअभिनेत्यांची गर्दी करुन, इस्लामपूरची बारामती करू, अशा वल्गना केल्या गेल्या आहेत. पण शहराचा विकास पाहता, रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि शहराचा विकास आराखडा या मूलभूत सुविधांपासून सर्वसामान्य जनता वंचित आहे. २४ तास पाणी देण्याची घोषणा हवेत विरली असून काही प्रभागात पाणी पुरवठाच होत नाही. शहरातील झालेली रस्त्यांची कामे पहिल्याच पावसात धुऊन गेली आहेत. तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याने डासांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. अलीकडील सहा महिन्यात औषध फवारणी झाल्याचे दिसत नाही.गत पावसाळ्यात झाडे लावलेल्या खड्ड्यांतच यावर्षीही पुन्हा एकदा झाडे लावण्याचा फार्स पालिकेने केला आहे. लघुशंकेसाठी शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेली स्वच्छतागृहे अज्ञातांनी काढून टाकली आहेत. ज्यांच्या व्यापारी संकुलनाच्या आसपास स्वच्छतागृहे होती, त्या मालकांनीच ती काढून टाकली आहेत. त्यांना काही नगरसेवकांचा पाठिंबा असल्यानेच त्यांच्याकडून हे कृत्य झाले आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच जेथे स्वच्छतागृहे आहेत, तेथील लोक त्याचा शौचालयासाठी वापर करत आहेत. या प्रकाराला किमान २ ते ३ महिन्यांचा कालावधी लोटला असून, पालिकेच्यावतीने मात्र कसलीही कार्यवाही झालेली नाही.बारामती पाहिल्यानंतर, शहराचा विकास करताना काय काय करता येऊ शकते हे दिसते. यामुळेच माजी मंत्री, आमदार जयंत पाटील नेहमीच नेते शरद पवार यांचे गोडवे गात इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी शहरातील नागरिकांसमोर मते मागण्यासाठी जाताना, शहराची बारामती करण्याचा पहिला मुद्दा असतो. परंतु निवडणूक झाल्यानंतर दिलेली सर्व आश्वासने सत्ताधारी आपसूकच विसरुन गेलेले असतात. खरोखरच जयंत पाटील यांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास जनतेने इस्लामपूरची बारामती करणारा नगराध्यक्ष निवडावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.