शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

प्रतापगडावर केवळ गवत अन् शेणीचीच होळी !

By admin | Updated: March 11, 2017 22:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

आॅनलाईन लोकमतमहाबळेश्वर (सातारा), दि. 11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यावर आजही साजरे केले जाणारे सण, उत्सव शिवरायांनी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच साजरे केले जातात. शिवरायांचे वृक्षप्रेम हे सर्वश्रूत आहे. म्हणूनच किल्ल्यावर गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा सुरू झाली. विशेष म्हणजे, गेल्या ३५८ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, शिवरायांच्या हुकूमाचे आजही काटेकोरपणे पालन केले जात आहे.प्रतापगड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. शिवरायांच्या अनेक आठवणी या किल्ल्याशी जोडल्या गेल्या आहेत. किल्ल्यावर असलेल्या भवानी मातेच्या स्थापना कालापासून शिवरायांनी या ठिकाणी विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. शिवरायांनी आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच सर्व सण पारंपरिक पद्धतीने आजही साजरे केले जात आहेत.होळी हा त्यापैकी एक सण. शिवराय हे वृक्षप्रेमी होते. वृक्षांचे महत्त्व ओळखून त्यांनी वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आणि रयतेलाही याचे महत्त्व विशद करून दिले. होळीच्या दिवशीही फळे, फुले देणाऱ्या वृक्षांची कत्तल न करता केवळ गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा शिवरायांनी भवानीमातेच्या स्थापनेपासून सुरू केली. या घटनेला ३५८ वर्षे झाली असली तरी आजही शिवरायांच्या हुकूमाचे काटेकोर पालन करून किल्ल्यावर होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे.असा होतो सण साजरा ...श्री भवानीमातेची होळी ही ऐतिहासिक होळी म्हणून ओळखली जाते. मंदिर परिसरातील होळीचा माळ याठिकाणी होळी पेटविली जाते. किल्लेदार विजय हवालदार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळीची विधिवत पूजा केली जाते. यानंतर हडप गुरुजी यांचा हस्ते होळी पेटवली जाते. ही होळी पेटविल्याशिवाय पंचक्रोशीतील होळ्या पेटविल्या जात नाहीत. अडीअडचणींवर एकीतून मातश्री भवानीमातेच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. दुसरा दिवस हा धुळवडीचा असतो त्या दिवशी सर्व ग्रामस्थ केदारेश्वर मंदिरात जमतात. याठिकाणी गावातील अडीअडचणींवर चर्चा केली जाते. तसेच त्या अडचणी सोडविण्यासाठी विचारविनिमय केला जातो. या परंपरेमुळे गावात एकी कायम राहत असून, विचार विनिमय झाल्याशिवाय किल्ल्यावर दैनंदिन व्यवहार सुरू होत नाहीत.