शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

प्रतापगडावर केवळ गवत अन् शेणीचीच होळी !

By admin | Updated: March 11, 2017 22:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

आॅनलाईन लोकमतमहाबळेश्वर (सातारा), दि. 11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यावर आजही साजरे केले जाणारे सण, उत्सव शिवरायांनी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच साजरे केले जातात. शिवरायांचे वृक्षप्रेम हे सर्वश्रूत आहे. म्हणूनच किल्ल्यावर गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा सुरू झाली. विशेष म्हणजे, गेल्या ३५८ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, शिवरायांच्या हुकूमाचे आजही काटेकोरपणे पालन केले जात आहे.प्रतापगड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. शिवरायांच्या अनेक आठवणी या किल्ल्याशी जोडल्या गेल्या आहेत. किल्ल्यावर असलेल्या भवानी मातेच्या स्थापना कालापासून शिवरायांनी या ठिकाणी विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. शिवरायांनी आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच सर्व सण पारंपरिक पद्धतीने आजही साजरे केले जात आहेत.होळी हा त्यापैकी एक सण. शिवराय हे वृक्षप्रेमी होते. वृक्षांचे महत्त्व ओळखून त्यांनी वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आणि रयतेलाही याचे महत्त्व विशद करून दिले. होळीच्या दिवशीही फळे, फुले देणाऱ्या वृक्षांची कत्तल न करता केवळ गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा शिवरायांनी भवानीमातेच्या स्थापनेपासून सुरू केली. या घटनेला ३५८ वर्षे झाली असली तरी आजही शिवरायांच्या हुकूमाचे काटेकोर पालन करून किल्ल्यावर होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे.असा होतो सण साजरा ...श्री भवानीमातेची होळी ही ऐतिहासिक होळी म्हणून ओळखली जाते. मंदिर परिसरातील होळीचा माळ याठिकाणी होळी पेटविली जाते. किल्लेदार विजय हवालदार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळीची विधिवत पूजा केली जाते. यानंतर हडप गुरुजी यांचा हस्ते होळी पेटवली जाते. ही होळी पेटविल्याशिवाय पंचक्रोशीतील होळ्या पेटविल्या जात नाहीत. अडीअडचणींवर एकीतून मातश्री भवानीमातेच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. दुसरा दिवस हा धुळवडीचा असतो त्या दिवशी सर्व ग्रामस्थ केदारेश्वर मंदिरात जमतात. याठिकाणी गावातील अडीअडचणींवर चर्चा केली जाते. तसेच त्या अडचणी सोडविण्यासाठी विचारविनिमय केला जातो. या परंपरेमुळे गावात एकी कायम राहत असून, विचार विनिमय झाल्याशिवाय किल्ल्यावर दैनंदिन व्यवहार सुरू होत नाहीत.