शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

साहित्यात आंतरिक परिवर्तनाची ताकद

By admin | Updated: December 28, 2015 00:29 IST

प्रदीप पाटील : बेळंकी येथे इरादा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास प्रतिसाद

सांगली : साहित्यातील ललितकलांचे माध्यम आणि साहित्याचे माध्यम यात फरक आहे. साहित्याचे माध्यम असणारी भाषा ही मुळात सामाजिक आहे. जगण्यातले अनुभव साहित्यिक सामर्थ्याने व्यक्त करतो. साहित्यातून व्यक्त होणारी भावना ही परिणामकारकपणे पोहोचत असल्याने साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असल्याने समाजासह प्रत्येकाच्या मनातील आंतरिक परिवर्तनाची खरी ताकद साहित्यातच असल्याचे प्रतिपादन नामवंत कवी प्रदीप पाटील यांनी केले. बेळंकी (ता. मिरज) येथे आयोजित दुसऱ्या इरादा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.पाटील पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात साहित्य चळवळ मूळ धरत आहे, ही साहित्याच्या आणि सुदृढ समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. साहित्य चळवळ राबविताना त्यात तरुणांचा वाढत असलेला सहभागही आशादायी असाच आहे. आजच्या तरुणांनी आपले विचार मांडताना साहित्याचा एक सशक्त माध्यम म्हणून वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रामीण साहित्य व ग्रामीण जीवन : काल आणि आज’ या विषयावर प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, खेड्यांची नागरिकीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्य आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज आहे. या संमेलनातून विचारांची देवाण-घेवाण होत असल्याने ग्रामीण भागातील समाज अधिक सुदृढ होण्यास मदत होणार आहे. ‘आजचा युवक आणि अध्यात्म’ या विषयावर बोलताना राजा माळगे म्हणाले, शास्त्र आणि विज्ञानाची तात्त्विक बैठक अध्यात्मात आहे. नाट्यलेखक इरफान मुजावर यांचे ‘माझ्या स्वप्नातला मी आणि वास्तव’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, सर्व काही असूनही मी अस्वस्थ का होतो?, या प्रश्नात आपली स्वप्ने दडलेली आहेत. सुरुवातीला आपण एका गोष्टीत गुंतत जात असताना, ज्यावेळी आपण त्यातून बाहेर येतो, त्यावेळी आपणच आपल्याला दोषी मानतो. ही अस्वस्थता महत्त्वाची आहे. जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम हे ‘आजची तरुणाई किती आॅनलाईन, किती आॅफलाईन’ या विषयावर बोलताना म्हणाले, आॅफलाईन जगण्यातही आनंद आहे, तो शोधला पाहिजे. तारतम्याने आॅनलाईन जिंदगीतही संवेदनशीलता जपली पाहिजे. कविसंमेलन दयासागर बन्ने व अन्य कवींच्या उपस्थितीत झाले, तर सायंकाळी आप्पासाहेब खोत यांचे विनोदी कथाकथन पार पडले. यावेळी सरपंच पांडुरंग कोरे, बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, खंडेराव जगताप, राजाराम गायकवाड, साहित्यिक मोहन पाटील, संतोष काळे, भीमराव पाटील, कवी नामदेव भोसले, चंद्रकांत बाबर, मनीषा पाटील यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. रवी कुंभार, नंदकुमार बिसुरे, तहसीलदार मदन जाधव, डॉ. मनोज पवार, अजित कुंडले यांच्यासह इरादा सामाजिक संस्थेच्यावतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. (प्रतिनिधी)गावाप्रती स्नेह : ‘इरादा’च्या उपक्रमाचे कौतुकइरादा सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे वैशिट्य म्हणजे बेळंकी आणि परिसरातील, मात्र नोकरीच्या निमित्ताने देशात आणि परदेशात असणाऱ्या तरुणांनी एकत्र येत केलेले नेटके संयोजन होय. गावात साहित्य चळवळ रुजावी, यासाठी ‘इरादा’च्या सदस्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.