शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

कलेच्या छंदात आयुष्याला समृद्ध करण्याचे सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:27 IST

मिरज : ज्याला कलेचे पंख नाहीत, त्याचे आयुष्य कलेवर होते. कलेच्या छंदात आयुष्य समृद्ध करण्याचे सामर्थ्य असते, असे प्रतिपादन ...

मिरज : ज्याला कलेचे पंख नाहीत, त्याचे आयुष्य कलेवर होते. कलेच्या छंदात आयुष्य समृद्ध करण्याचे सामर्थ्य असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक प्रवीण दवणे यांनी केले.

मिरजेत कन्या महाविद्यालयात मराठी व सांस्कृतिक विभागातर्फे ‘माझ्या कवितेची आनंदयात्रा’ या विषयावर दवणे यांचे व्याख्यान, तसेच मातोश्री पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष विनायक गोखले अध्यक्षस्थानी हाेते. यावेळी संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी यांनी स्वागत केले. ज्योती पांगळे हिने स्वागतगीत गायले. डॉ. जयकुमार चंदनशिवे यांनी परिचय करून दिला. दवणे यांनी ‘माझ्या कवितेची आनंदयात्रा’ सादर करीत उपस्थितांशी संवाद साधला. मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, बा. भ. बोरकर, इंदिरा संत यांच्या साहित्यामुळे मी घडलो. फक्त अर्थार्जन म्हणजे जगणं नसतं, तर चांगलं संगीत, कला, चित्र, शिल्प, काव्य, प्रवास यांची जोपासना करणं हे खरं जगणं आहे. लेखन व कवितांतून जगणं शिकून ही आनंदयात्रा घडवू शकलो, असेही ते म्हणाले.

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कीर्ती महाजन यांना प्रवीण दवणे यांच्या हस्ते मातोश्री पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थिनी दत्तक योजनेतील विद्यार्थिनींना दवणे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य, प्रवेश व बोर्ड फी व नवीन कपडे देण्यात आले. गुणवंत विद्यार्थिनींना रोख रक्कम देण्यात आली. महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. माधुरी देशमुख, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, प्रा. मानसी शिरगावकर, प्रा. सुवर्णा यमगर, प्रा. बी. आर. पवार, प्रा. पूनम होवाळ यांनी संयोजन केले. प्रा. पांडुरंग तपासे यांनी आभार मानले.