शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

सक्षम भू-विकास बॅँकांबाबत सकारात्मक चर्चा

By admin | Updated: November 23, 2014 00:43 IST

प्रश्न पुनरुज्जीवनाचा : राज्यातील सर्वच बँकांना दिलासा देण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

अविनाश कोळी, सांगली :राज्यातील अडचणीत सापडलेल्या ‘भू-विकास’च्या २१ बँका व शिखर बँकांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न नव्या सरकारदरबारी मांडण्यात आला आहे. चौगुले समितीने केलेल्या शिफारशीनुसार अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी राज्य सहकारी भू-विकास बँक कर्मचारी संघटनेने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नुकतीच केली. राज्यातील ११ सक्षम भू-विकास बँकांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून नव्या शासनामार्फत हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडविला जावा, अशी अपेक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी व्यक्त केली आहे. भू-विकास बँकांच्या आर्थिक स्थितीचा व त्यावरील निष्कर्षांचा अहवाल चार्टर्ड अकाऊंटंट डी. ए. चौगुले समितीने तत्कालीन आघाडी शासनाकडे सादर केला होता. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही आघाडी सरकारने याबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भू-विकास कर्मचारी संघटनेने नव्या सरकारदरबारी हा प्रश्न मांडण्यास सुरुवात केली आहे. सहकारमंत्री व सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांसमवेत याबाबतची प्राथमिक चर्चा नुकतीच झाली. चौगुले समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील भू-विकास बँकांचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने केवळ त्याबाबत सकारात्मक पावले उचलायला हवीत, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांसमोर मांडले. अहवालातील मुद्देही त्यांच्यासमोर मांडण्यात आले. चौगुले समिती व शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड अशा अकरा बँका त्यांचे दायित्व देण्यास समर्थ आहेत. शासनाने बँक गॅरंटीपोटी दिलेली रक्कम सॉफ्ट लोन म्हणून मान्य केल्यास राज्यातील सर्वच जिल्हा बँका २३० कोटी ११ लाख रुपयांनी फायद्यात येऊ शकतात. या दोन्ही गोष्टींकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. सहकारमंत्र्यांनी सक्षम बँकांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर्मचारी संघटनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.