शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलणार

By admin | Updated: December 23, 2014 23:50 IST

संपतराव पवार : आभाळमाया फौंडेशनच्या सहकार्याने हिवतडमध्ये पहिला प्रयोग

सांगली : पाणी आणि फळशेती यांचे सूत्रबध्द नियोजन करून उजाड माळ वृक्षाच्छादित करणे शक्य आहे. सांगलीतील आभाळमाया फौंडेशनच्या सहकार्याने हिवतड (ता. आटपाडी) येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यात दहा शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती पथदर्शी प्रकल्पाचे समन्वयक संपतराव पवार यांनी दिली.पवार म्हणाले की, महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या घटना घडण्यास निसर्ग कारणीभूत आहे, धोरण कारणीभूत आहे, की नियोजन कारणीभूत आहे, हे पडताळून पाहण्याची गरज आहे. दुष्काळी भागाचा प्रमुख आधार पशुधन आहे. प्रत्येक टंचाईच्या काळात चाराटंचाई तीव्र होते, हा अनुभव सतत येऊनही उपाययोजना करणारी एकही योजना शासनाकडे नाही. सोयाबीन, कापूस यासारखी पिके हाती लागली नाहीत, तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडतो. झाडे वाळली, तर खात्रीशीर फायदा देणारी फळशेती उद्ध्वस्त होते. शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडून पडते. त्यातून शेतकरी आत्महत्येकडे वळतो. या शेतकऱ्यांना योग्य मार्गावर नेण्यासाठी फळशेती आणि पाणी यांचे सूत्रबध्द नियोजन करण्याचे धोरण ठरविले आहे. यातूनच हिवतड येथील धनाजी मंडले, हणमंत मंडले, सुनीता मंडले, रघुनाथ मंडले, उमाजी मंडले, राजू पोळ, पोपट मंडले, सोपान मंडले, चंद्रकांत मंडले, दीपा मंडले या शेतकऱ्यांचा ‘जय मल्हार ग्रुप’ केला आहे. या शेतकऱ्यांच्या कोरडवाहू एक एकर क्षेत्रात डाळिंब लागवड केली जाणार आहे. डाळिंबाच्या प्रत्येक झाडास दरवर्षी पुरेसे म्हणजे ४०० लिटर पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बागेमध्ये शंभर टक्के सेंद्रीय खताचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक क्षेत्रास दोन हजार लिटर पाणीसाठा करण्यासाठी टाकी, होजपाईपद्वारे प्रत्येक झाडास पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक एकर डाळिंब बागेसाठी चाळीस हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचीही शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली असून २८ डिसेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. सांगलीतील आभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र व्होरा, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जयंत बर्वे, पर्यावरणतज्ज्ञ अजित तथा पापा पाटील आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे. (प्रतिनिधी)