शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ‘ऑपरेशन मु्स्कान’मुळे ३८ बालकांच्या चेहऱ्यावर हसू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

सांगली : घरातील कौटुंबिक कलहामुळे घरातून निघून गेलेल्या अथवा हरवलेल्या बालकांचा पुन्हा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी ...

सांगली : घरातील कौटुंबिक कलहामुळे घरातून निघून गेलेल्या अथवा हरवलेल्या बालकांचा पुन्हा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या या मोहिमेत शून्य ते १८ वयोगटातील १८ मुले तर २० मुली अशा ३८ जणांचा शोध घेण्यात पाेलिसांना यश आले असून, त्यांना सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अजाणत्या वयात पालकांकडून झालेली मानहानी जिव्हारी लावून घेत अनेक मुले घरातून बाहेर पडतात तर काहीवेळेस मुलांचे अपहरण करुन त्यांना चुकीच्या मार्गाला लावले जाते. यात मुलांकडून भीक मागण्याचे, हॉटेलमध्ये काम अथवा इतर कामांसाठीही त्यांचा वापर केला जातो. कोरोनामुळे सुरु असलेल्या निर्बंधांमुळे अडचणीत अजूनच भर पडली आहे. या कालावधीत घरातील ताण सहन न झाल्यानेही काही बालके घर सोडून पलायन करत आहेत. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर खरे वास्तव समजत असले तरी परतीचे मार्ग बंद झाल्याने अनेकजण मिळेल ते काम करुन गुजराण करतात.

अशाचा बालकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यासाठी पोलीस दलातर्फे दरवर्षी ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत महिनाभराच्या कालावधीत मुलांच्या अपहरण, पलायनाच्या नोंदी घेऊन त्यांच्या शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते.

क्षणिक रागामुळे घरातून बाहेर पडलेल्या मुलांना शोधून त्यांना पालकांच्या ताब्यात देताना अनेकवेळा पोलिसांची कसोटी लागते. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडूनही या बालकांचे विशेष समुपदेशन केले जाते. घरातून बाहेर पडल्यानंतर झालेले हाल व घरात आल्यानंतर मिळणारी वागणूक याबाबत त्यांना आश्वस्त करत प्रसंगी पालकांचेही समुपदेशन केले जाते. त्यामुळे भविष्यात अशी मुले पुन्हा पलायनाचा निर्णय घेत नाहीत.

चौकट

आमिषाला बळी ठरणाऱ्यांचे प्रमाण अधिक

पौगंडावस्थेत मोबाईलसह इतर वस्तूंच्या आकर्षणासाठी घरात हट्ट केल्यानंतर ती न मिळाल्यास अनेकजण थेट घरातून पलायन करतात. याशिवाय काही अल्पवयीन मुली लग्नाच्या अमिषाला अथवा आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळूनही पलायन करतात. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ प्रभावी ठरत आहे.

कोट

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या सूचनेनुसार, जून महिन्यात ऑपरेशन मुस्कान माेहीम राबविण्यात आली. यात पलायन केलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या मुलांचे योग्य ते समुपदेशन करुन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येत असल्याने पुढील अडचणी कमी होण्यासही मदत होणार आहे.

- मायादेवी काळगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक.

चौकट

‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये सापडलेली मुलांची संख्या ३८

मुले १८

मुली २०