शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दराच्या षड्यंत्राने द्राक्ष हंगाम कडवट

By admin | Updated: March 9, 2017 23:21 IST

उत्पादकांना चिंता : अनुकूल वातावरण असूनही तासगाव तालुक्यात दलाल, व्यापाऱ्यांमुळे फटका

प्रदीप पोतदार ल्ल कवठेएकंदयंदा तासगाव तालुक्यातील द्राक्षपट्ट्यातील शेतकऱ्यांना हवामानाने तारले आहे. त्यामुळे यंदा द्राक्षांचा गोडवा अधिक वाढला आहे. गतवेळच्या तुलनेत औषध फवारणी कमी प्रमाणात करावी लागली आहे. पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु एकाचवेळी बहुतांशी द्राक्षमाल काढणीला आला असल्याने द्राक्ष दलाल व व्यापारी मंडळींकडून होणाऱ्या दराच्या षड्यंत्रामुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता, येत्या पंधरवड्यात द्राक्षदर सुधारण्याची शक्यता आहे. बदलते हवामान, द्राक्ष दराची जाणीवपूर्वक घसरण अशा नैसर्गिक व कृत्रिम समस्यांचा मुकाबला शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा मात्र हवामानाची पोषक साथ लाभल्याने औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच पोषक वातावरणामुळे द्राक्ष उत्पादनातही वाढ झाली आहे. सध्या थंडी संपून उन्हाचा पारा चढू लागल्याने बाजारात द्राक्षांना मागणी वाढतच आहे. किरकोळ विक्रेते, दलाल यांच्याकडे स्थानिक ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी वाढत आहे. पण प्रत्यक्षात उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही. सध्या १२० ते २२०-२६० रूपये प्रति चार किलोस दर मिळत आहे. एकाचवेळी छाटणी घेतलेल्या बागांमधील द्राक्षे काढणीला आली असल्याने दराची कृत्रिम घसरण झाली आहे. अशामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे कल ठेवला आहे. चोरोची, ढालगाव पट्ट्यातील बेदाणा रॅकवर द्राक्षमाल पाठवला जात आहे. द्राक्ष हंगामाच्या लगबगीमुळे तासगावतील सावळज, डोंगरसोनी, मणेराजुरी, कवठेएकंद, तसेच सोनी, मालगाव, आरग, कवलापूर भागात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.यंदा गोडी अधिकच...गतवेळच्या तुलनेत यंदा हवामानाची साथ मिळाली असल्याने द्राक्षांच्या उत्पन्नात ४० टक्केपर्यंत वाढ झाली आहे, तसेच औषध फवारणीसाठीही कमी खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी अधिक असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यासाठी द्राक्षांना मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे दर तेजीत राहून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.द्राक्षपंढरीतही हमीभावाची उणीव तासगाव ही द्राक्षपंढरी. तरीही हमीभाव मिळत नाही. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असतात. दर पाडले जाऊन आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना निसर्गाकडून आणि व्यापाऱ्यांकडूनही फसवणूक होत असते. याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे. कृषी विभागाने तसेच प्रशासनाने पिकांच्या दराबाबत किंवा द्राक्ष व बेदाणा यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बागायतदारांना मार्गदर्शन द्राक्षपंढरीमध्ये बागायतदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध मार्गानी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बाजारभावाबरोबरच तिथे पाण्याचीही समस्या आहे. याबरोबरच आरफळ, म्हैसाळ, पुणदी उपसा सिंचन अशा योजना राजकीय हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी चालविणे महत्त्वाचे आहे. तरच जिगरबाज शेतकऱ्यांसाठी द्राक्षशेती संजीवनी ठरणार आहे. याबाबत दीर्घकालीन उपाययोजना व जलजागृती कार्यक्रम हाती घेऊन प्रबोधनातून टंचाई निवारणाची गरज आहे. अशाप्रकारे मार्गदर्शन झाले तरच द्राक्ष उत्पादकांना फायदेशीर ठरणार आहे.