शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दराच्या षड्यंत्राने द्राक्ष हंगाम कडवट

By admin | Updated: March 9, 2017 23:21 IST

उत्पादकांना चिंता : अनुकूल वातावरण असूनही तासगाव तालुक्यात दलाल, व्यापाऱ्यांमुळे फटका

प्रदीप पोतदार ल्ल कवठेएकंदयंदा तासगाव तालुक्यातील द्राक्षपट्ट्यातील शेतकऱ्यांना हवामानाने तारले आहे. त्यामुळे यंदा द्राक्षांचा गोडवा अधिक वाढला आहे. गतवेळच्या तुलनेत औषध फवारणी कमी प्रमाणात करावी लागली आहे. पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु एकाचवेळी बहुतांशी द्राक्षमाल काढणीला आला असल्याने द्राक्ष दलाल व व्यापारी मंडळींकडून होणाऱ्या दराच्या षड्यंत्रामुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता, येत्या पंधरवड्यात द्राक्षदर सुधारण्याची शक्यता आहे. बदलते हवामान, द्राक्ष दराची जाणीवपूर्वक घसरण अशा नैसर्गिक व कृत्रिम समस्यांचा मुकाबला शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा मात्र हवामानाची पोषक साथ लाभल्याने औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच पोषक वातावरणामुळे द्राक्ष उत्पादनातही वाढ झाली आहे. सध्या थंडी संपून उन्हाचा पारा चढू लागल्याने बाजारात द्राक्षांना मागणी वाढतच आहे. किरकोळ विक्रेते, दलाल यांच्याकडे स्थानिक ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी वाढत आहे. पण प्रत्यक्षात उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही. सध्या १२० ते २२०-२६० रूपये प्रति चार किलोस दर मिळत आहे. एकाचवेळी छाटणी घेतलेल्या बागांमधील द्राक्षे काढणीला आली असल्याने दराची कृत्रिम घसरण झाली आहे. अशामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे कल ठेवला आहे. चोरोची, ढालगाव पट्ट्यातील बेदाणा रॅकवर द्राक्षमाल पाठवला जात आहे. द्राक्ष हंगामाच्या लगबगीमुळे तासगावतील सावळज, डोंगरसोनी, मणेराजुरी, कवठेएकंद, तसेच सोनी, मालगाव, आरग, कवलापूर भागात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.यंदा गोडी अधिकच...गतवेळच्या तुलनेत यंदा हवामानाची साथ मिळाली असल्याने द्राक्षांच्या उत्पन्नात ४० टक्केपर्यंत वाढ झाली आहे, तसेच औषध फवारणीसाठीही कमी खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी अधिक असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यासाठी द्राक्षांना मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे दर तेजीत राहून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.द्राक्षपंढरीतही हमीभावाची उणीव तासगाव ही द्राक्षपंढरी. तरीही हमीभाव मिळत नाही. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असतात. दर पाडले जाऊन आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना निसर्गाकडून आणि व्यापाऱ्यांकडूनही फसवणूक होत असते. याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे. कृषी विभागाने तसेच प्रशासनाने पिकांच्या दराबाबत किंवा द्राक्ष व बेदाणा यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बागायतदारांना मार्गदर्शन द्राक्षपंढरीमध्ये बागायतदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध मार्गानी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बाजारभावाबरोबरच तिथे पाण्याचीही समस्या आहे. याबरोबरच आरफळ, म्हैसाळ, पुणदी उपसा सिंचन अशा योजना राजकीय हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी चालविणे महत्त्वाचे आहे. तरच जिगरबाज शेतकऱ्यांसाठी द्राक्षशेती संजीवनी ठरणार आहे. याबाबत दीर्घकालीन उपाययोजना व जलजागृती कार्यक्रम हाती घेऊन प्रबोधनातून टंचाई निवारणाची गरज आहे. अशाप्रकारे मार्गदर्शन झाले तरच द्राक्ष उत्पादकांना फायदेशीर ठरणार आहे.