शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नवसाहित्यिकांच्या प्रतिभेला साहित्य संमेलनांतून व्यासपीठ

By admin | Updated: October 26, 2016 00:09 IST

भारती पाटील : तासगाव येथे कोजागरी साहित्य संमेलन

तासगाव : शहरात नवकवींसाठी ‘कोजागरी साहित्य संमेलन’ हे नवोदित कवींच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकारची साहित्यसंमेलने अखंडपणे चालू ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. भारती पाटील यांनी केले.जीवन विकास संस्थेच्या कलासाधक शाखेच्यावतीने दहावे कविसंमेलन तासगावात पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ कवी मा. प्रा. भीमराव धुळूबुळू व जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर उपस्थित होते. के. वाय. कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी वाचन संस्कृतीविषयी माहिती सांगितली. सध्या टीव्ही, सोशल नेटवर्किंगयाचे वर्चस्व वाढले असून, त्यामध्ये माणूस मागे पडल्याचे सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर कविता सादर करण्यात आल्या. भाग्यश्री सावंत यांनी ‘झेप’ या कवितेत स्त्रीचे कर्तृत्व सांगितले. निमंत्रितांमध्ये महाराष्ट्ररत्न वि. स. पागे विद्यानिकेतन कृषी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एच. जमादार यांनी शालेय जीवनातील कविता सादर केल्या. डॉ. भारती पाटील यांनी ‘सांगता येत नाही आणि सहन होत नाही’ या सत्य स्थितीवर काव्यातून प्रकाश टाकला.या सोहळ्यासाठी जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर, कोषाध्यक्ष एल. डी. म्हेत्रे, मा. तु. पां. माळी, कमल कोळेकर उपस्थित होते. विनया कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. (वार्ताहर)