शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

नवसाहित्यिकांच्या प्रतिभेला साहित्य संमेलनांतून व्यासपीठ

By admin | Updated: October 26, 2016 00:09 IST

भारती पाटील : तासगाव येथे कोजागरी साहित्य संमेलन

तासगाव : शहरात नवकवींसाठी ‘कोजागरी साहित्य संमेलन’ हे नवोदित कवींच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकारची साहित्यसंमेलने अखंडपणे चालू ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. भारती पाटील यांनी केले.जीवन विकास संस्थेच्या कलासाधक शाखेच्यावतीने दहावे कविसंमेलन तासगावात पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ कवी मा. प्रा. भीमराव धुळूबुळू व जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर उपस्थित होते. के. वाय. कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी वाचन संस्कृतीविषयी माहिती सांगितली. सध्या टीव्ही, सोशल नेटवर्किंगयाचे वर्चस्व वाढले असून, त्यामध्ये माणूस मागे पडल्याचे सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर कविता सादर करण्यात आल्या. भाग्यश्री सावंत यांनी ‘झेप’ या कवितेत स्त्रीचे कर्तृत्व सांगितले. निमंत्रितांमध्ये महाराष्ट्ररत्न वि. स. पागे विद्यानिकेतन कृषी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एच. जमादार यांनी शालेय जीवनातील कविता सादर केल्या. डॉ. भारती पाटील यांनी ‘सांगता येत नाही आणि सहन होत नाही’ या सत्य स्थितीवर काव्यातून प्रकाश टाकला.या सोहळ्यासाठी जीवन विकास संस्थेचे सचिव के. वाय. कोळेकर, कोषाध्यक्ष एल. डी. म्हेत्रे, मा. तु. पां. माळी, कमल कोळेकर उपस्थित होते. विनया कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. (वार्ताहर)