शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

पाईपलाईनद्वारेच शेतीला पाणी हव

By admin | Updated: July 27, 2014 23:59 IST

डोंगरवाडी संघर्ष समिती : मतदानावरील बहिष्कार कायमे

सोनी : वन विभागाच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी, अजून अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी डोंगरवाडी योजनेचे उद्घाटन करून या भागाला आशेवरच ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला उद्घाटनाच्या नारळातील पाणी नको, तर कालव्याचे पाणी पाईपलाईनमधून शेतकऱ्यांच्या शेतात आलेले पहायचे आहे, असे मत या संघर्ष समितीचे समन्वयक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. पाटील म्हणाले की, सोनीसह परिसराला म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी मिळावे यासाठी गेल्या महिन्याभरापासून डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने या योजनेच्या कामाला गती येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे व त्या ठिकाणी काम चालू करून पाणी देण्यातील अडचण सुटली आहे. पण या एकाच समस्येनंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले असे नसून पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेपर्यंत हा आमचा लढा चालूच राहणार असून तोपर्यंत मतदानावर बहिष्काराचा निर्धार कायम असणार आहे व त्यासाठी ही संघर्ष समिती लढा देतच राहणार आहे.आतापर्यंत अनेक नेत्यांनी या योजनेचे नारळ फोडले असून अवघ्या सहा महिन्यात पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण याला आज १५ वर्षे लोटली तरी पाणी मिळाले नसल्याने, नेत्यांच्या आश्वासनाला आम्ही बळी न पडता पाणी मिळेपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे, असे मत यावेळी अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सतीश जाधव, चंपाताई जाधव, रमेश कदम, उल्हास माळकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी बांधापर्यंत पोहोचेपर्यंत लढामागील महिन्याभरापासून डोंगरवाडी उपसासिंचन योजनेच्या संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने या योजनेच्या कामाला गती येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्या ठिकाणी काम चालू करून पाणी देण्याची समस्या सुटली आहे. पण या एकाच समस्येच्या सोडवणुकीनंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले असे नसून, पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेपर्यंत हा आमचा लढा सुरु राहणार असून तोपर्यंत मतदानावर बहिष्काराचा निर्धार कायम असणार आहे, असा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.