शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

आमराईबाबत हरित न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST

सांगली : शहरातील आमराई उद्यानाचा व्यावसायिक वापर थांबवावा. तेथील नैसर्गिक सौंदर्याला बाधा येऊ नये ...

सांगली : शहरातील आमराई उद्यानाचा व्यावसायिक वापर थांबवावा. तेथील नैसर्गिक सौंदर्याला बाधा येऊ नये या मागणीसाठी सांगली जिल्हा संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालय व हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत न्यायालयाने नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समितीचे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले की, महापालिका प्रशासनाने आमराईत ट्रेन सुरू करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. तसेच अंतर्गत विकासाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे आमराईच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याला बाधा येणार आहे. मिरजेतील डॉ. आंबेडकर उद्यानामधील मिनी ट्रेन वर्षानुवर्षे बंद अवस्थेत आहे. त्याचा काहीही वापर होत नाही. असे असताना आमराईमध्ये लहान मुलासाठी ट्रेन सुरू करण्याबाबत प्रशासनाची कार्यतत्परता हा चर्चेचा विषय झाला आहे.

महापालिकेने आमराईचा व्यावसायिक वापर करण्याबाबत केलेला ठराव बेकायदेशीर आहे. नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

आमराई बगीचा हा शहराचा ऑक्सिजन निर्माण करणारा कारखाना आहे. तेथे विविध प्रकाचे दुर्मीळ वृक्ष, पक्षी आणि फुलपाखरे आहेत. याची दखल आंतरराष्ट्रीय शोधनिबंधातून घेतली गेली आहे. कोणतीही नैसर्गिक आणि पर्यावरणास हानी करणारी कृती महापालिकेने करू नये आणि आजपर्यंत झालेली हानीची भरपाई करून आमराईच्या नैसर्गिक साधनसंपत्ती कायम राखावी म्हणून समितीच्यावतीने तानाजी राईकर यानी राष्ट्रीय हरित न्यायालयात तर रवींद्र चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले.

यावेळी इर्शाद पालेगार, अ‍ॅड. श्रीकृष्ण पोतकुळे, अ‍ॅड. दीपक नांगरे-पाटील, अ‍ॅड. विनय पाटील, गोरख वनखडे, आसिफ मुजावर, संतोष कदम, रवींद्र ढोबळे, सुनील गिड्डे, राजु ऐवळे, महेश जाधव, प्रसाद मोहिते, मुकुंद भोरे, विनायक ओलेकर, शकील शेख, योगश वडेरा उपस्थित होते.

चौकट

ॲड. ओंकार वांगीकार म्हणाले की, हस्तांतर कराराचा मूळ उद्देश हा पर्यावरणाचे रक्षण आणि वृध्दी हा असताना महापालिकेने आमराईतील नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करून पर्यावरणाची हानी केली आहे. ही सरळ सरळ कराराचा भंग करणारी कृती आहे. या कृतीबददल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी हरित न्यायालयात केली आहे.