शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

सत्ताधाऱ्यांचा मोर्चा म्हणजे अजबच!

By admin | Updated: August 26, 2015 23:03 IST

पतंगराव कदम : दुष्काळाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

सांगली : केवळ बनवाबनवी आणि फसवाफसवी झाल्याने लोकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाच मोर्चा म्हणजे अजबच प्रकार आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, शासनाने अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. या घोषणांचा काहीही उपयोग झाला नाही. ‘अच्छे दिन की बुरे दिन’ हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. जशी मोदींची लाट आली होती, तशीच त्यांच्या विरोधातील लाट आता तयार होत आहे. राज्य करावे तर काँग्रेसनेच करावे, असे लोक आता म्हणत आहेत. लोकांचा पूर्ण अपेक्षाभंग झाला आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या घटकपक्षांच्याही अडचणी वाढल्या आहेत. प्रत्येकालाच लाल दिव्याची गाडी हवी आहे. लोक आग्रही असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे राजकीय पातळीवरही सगळा आनंदच आहे. दुष्काळाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असतानाही, सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही. आम्ही दिलेले स्थायी आदेशच पुढे रेटले असते, तरी दुष्काळी भागाला मदत झाली असती. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता, तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे. (प्रतिनिधी)दोनच मते विरोधातसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व हमालांनीही सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता केवळ दोनच मते विरोधात आहेत. आधुनिकीकरण तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्व नवे चेहरे असल्यामुळे स्वच्छ व पारदर्शी कारभार होईल, याची खात्री त्यांनी व्यक्त केली.