शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

सत्ताधाऱ्यांचा मोर्चा म्हणजे अजबच!

By admin | Updated: August 26, 2015 23:03 IST

पतंगराव कदम : दुष्काळाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

सांगली : केवळ बनवाबनवी आणि फसवाफसवी झाल्याने लोकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाच मोर्चा म्हणजे अजबच प्रकार आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, शासनाने अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. या घोषणांचा काहीही उपयोग झाला नाही. ‘अच्छे दिन की बुरे दिन’ हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. जशी मोदींची लाट आली होती, तशीच त्यांच्या विरोधातील लाट आता तयार होत आहे. राज्य करावे तर काँग्रेसनेच करावे, असे लोक आता म्हणत आहेत. लोकांचा पूर्ण अपेक्षाभंग झाला आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या घटकपक्षांच्याही अडचणी वाढल्या आहेत. प्रत्येकालाच लाल दिव्याची गाडी हवी आहे. लोक आग्रही असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे राजकीय पातळीवरही सगळा आनंदच आहे. दुष्काळाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असतानाही, सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही. आम्ही दिलेले स्थायी आदेशच पुढे रेटले असते, तरी दुष्काळी भागाला मदत झाली असती. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता, तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे. (प्रतिनिधी)दोनच मते विरोधातसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व हमालांनीही सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता केवळ दोनच मते विरोधात आहेत. आधुनिकीकरण तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्व नवे चेहरे असल्यामुळे स्वच्छ व पारदर्शी कारभार होईल, याची खात्री त्यांनी व्यक्त केली.