शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

खासगी विद्यापीठांच्या उभारणीत पतंगराव कदम यांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार ...

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार यांनी संवाद साधला. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह, विश्व विद्यालयाचे प्र कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्‍वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ.के.डी. जाधव, डॉ.एम.एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.

डॉ.मुजुमदार म्हणाले. काेरोनामुळे विद्यार्थी नसलेला विद्यापीठाचा परिसर पाहणे क्लेशदायक वाटते. बागा आहेत, पण फुले नाहीत, अशी अवस्था आहे. विध्वंसक काेरोनाने माणसांना स्वतःविषयी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. अशाश्वततेची जाणीव करून देताना साधेपणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. काेरोनाची लाट संपल्यानंतर सर्व काही पूर्ववत होईल, अशी आशा आहे.

डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, काेरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रयोगशाळेतील संशोधनाचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे असून, संशोधनात माणसांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, अशा संशोधनात भारती विद्यापीठ अग्रेसर आहे.

डॉ.विश्‍वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ.पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले.

डॉ.साळुंखे यांनी भारती विश्वविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे, असे सांगितले. विचार भारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी यांनी स्वागत केले. जी.जयकुमार यांनी आभार मानले.