शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विद्यापीठांच्या उभारणीत पतंगराव कदम यांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार ...

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार यांनी संवाद साधला. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह, विश्व विद्यालयाचे प्र कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्‍वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ.के.डी. जाधव, डॉ.एम.एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.

डॉ.मुजुमदार म्हणाले. काेरोनामुळे विद्यार्थी नसलेला विद्यापीठाचा परिसर पाहणे क्लेशदायक वाटते. बागा आहेत, पण फुले नाहीत, अशी अवस्था आहे. विध्वंसक काेरोनाने माणसांना स्वतःविषयी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. अशाश्वततेची जाणीव करून देताना साधेपणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. काेरोनाची लाट संपल्यानंतर सर्व काही पूर्ववत होईल, अशी आशा आहे.

डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, काेरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रयोगशाळेतील संशोधनाचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे असून, संशोधनात माणसांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, अशा संशोधनात भारती विद्यापीठ अग्रेसर आहे.

डॉ.विश्‍वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ.पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले.

डॉ.साळुंखे यांनी भारती विश्वविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे, असे सांगितले. विचार भारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी यांनी स्वागत केले. जी.जयकुमार यांनी आभार मानले.