शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विद्यापीठांच्या उभारणीत पतंगराव कदम यांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार ...

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचा २६वा स्थापना दिन काेरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुजुमदार यांनी संवाद साधला. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह, विश्व विद्यालयाचे प्र कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्‍वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ.के.डी. जाधव, डॉ.एम.एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार यावेळी उपस्थित होते.

डॉ.मुजुमदार म्हणाले. काेरोनामुळे विद्यार्थी नसलेला विद्यापीठाचा परिसर पाहणे क्लेशदायक वाटते. बागा आहेत, पण फुले नाहीत, अशी अवस्था आहे. विध्वंसक काेरोनाने माणसांना स्वतःविषयी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे. अशाश्वततेची जाणीव करून देताना साधेपणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. काेरोनाची लाट संपल्यानंतर सर्व काही पूर्ववत होईल, अशी आशा आहे.

डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, काेरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्रयोगशाळेतील संशोधनाचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे असून, संशोधनात माणसांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, अशा संशोधनात भारती विद्यापीठ अग्रेसर आहे.

डॉ.विश्‍वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठ स्थापनेपासूनच डॉ.पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कायम ध्येयवादाने कार्यरत राहिलेले आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले.

डॉ.साळुंखे यांनी भारती विश्वविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर करताना, नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी भारती विद्यापीठ सज्ज आहे, असे सांगितले. विचार भारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी यांनी स्वागत केले. जी.जयकुमार यांनी आभार मानले.