शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

जतमध्ये कागदोपत्रीच पंचनामे

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

प्रशासनाचा अजब कारभार : ४२३९ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

संख : मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जत तालुक्यातील ४ हजार २३९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरिपाच्या पिकासह द्राक्ष, डाळिंब फळबागांचे नुकसान झाले. अवकाळीचा सर्वाधिक फटका बेदाणा उत्पादक, फळबागायतदारांना बसला आहे. द्राक्ष बागांचेही नुकसान झाले होते. परंतु प्रशासनाने जागेवर न जाता वस्तुनिष्ठ पंचनामे केलेले नाहीत. ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.अवकाळी पावसाने तालुक्यामध्ये १० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु प्रशासनाने कमी नुकसानीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार १ कोटी ५० लाख ८० हजार मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना तुटपुंजीच मदत मिळणार आहे.रब्बी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली होती. शिवारभर पिके बहरली होती. चांगल्या उत्पादनाची आशा शेतकरी बाळगून होता. परंतु अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षांना तडे गेले. निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. रॅकवर टाकलेला बेदाणा भिजला. बेदाणा काळा पडला. परिणामी उतारा कमी निघाला.जिल्हा प्रशासनाने कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवकांना संयुक्तपणे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु पंचनामे वस्तुनिष्ठपणे केलेले नाहीत. जास्त नुकसान होऊनही ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. पंचनाम्यानुसार ४ हजार २३९ शेतकऱ्यांचे २ हजार १७३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे १ हजार ८५६ हेक्टर, हरभरा १६३.३५ हेक्टर, गहू ११८.८७ हेक्टर, द्राक्षे ०० हेक्टर, बेदाणा ९८५.५० टनाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. शासनाकडे १ कोटी ५ लाख ८० हजार रुपये मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात पिकांचे, द्राक्षे, बेदाणा, डाळिंबाचे नुकसान जादा झाले आहे. (वार्ताहर)अवकाळीचे पंचनामे चुकीचे केलेले आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्र कमी झाले आहे. युती शासनाने शेतकऱ्यांना नुकसान मदतीची रक्कम वाढवावी. पंचनामे वस्तुनिष्ठ करण्याची आमची मागणी आहे.- चंद्रशेखर रेबगोंडपूर्व विभाग अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना