शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जतमध्ये कागदोपत्रीच पंचनामे

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

प्रशासनाचा अजब कारभार : ४२३९ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

संख : मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जत तालुक्यातील ४ हजार २३९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरिपाच्या पिकासह द्राक्ष, डाळिंब फळबागांचे नुकसान झाले. अवकाळीचा सर्वाधिक फटका बेदाणा उत्पादक, फळबागायतदारांना बसला आहे. द्राक्ष बागांचेही नुकसान झाले होते. परंतु प्रशासनाने जागेवर न जाता वस्तुनिष्ठ पंचनामे केलेले नाहीत. ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.अवकाळी पावसाने तालुक्यामध्ये १० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु प्रशासनाने कमी नुकसानीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार १ कोटी ५० लाख ८० हजार मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना तुटपुंजीच मदत मिळणार आहे.रब्बी हंगामातील पिकांची उगवण चांगली झाली होती. शिवारभर पिके बहरली होती. चांगल्या उत्पादनाची आशा शेतकरी बाळगून होता. परंतु अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षांना तडे गेले. निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. रॅकवर टाकलेला बेदाणा भिजला. बेदाणा काळा पडला. परिणामी उतारा कमी निघाला.जिल्हा प्रशासनाने कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवकांना संयुक्तपणे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु पंचनामे वस्तुनिष्ठपणे केलेले नाहीत. जास्त नुकसान होऊनही ५० टक्केपेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. पंचनाम्यानुसार ४ हजार २३९ शेतकऱ्यांचे २ हजार १७३.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामध्ये ज्वारीचे १ हजार ८५६ हेक्टर, हरभरा १६३.३५ हेक्टर, गहू ११८.८७ हेक्टर, द्राक्षे ०० हेक्टर, बेदाणा ९८५.५० टनाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. शासनाकडे १ कोटी ५ लाख ८० हजार रुपये मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात पिकांचे, द्राक्षे, बेदाणा, डाळिंबाचे नुकसान जादा झाले आहे. (वार्ताहर)अवकाळीचे पंचनामे चुकीचे केलेले आहेत. त्यामुळे बाधित क्षेत्र कमी झाले आहे. युती शासनाने शेतकऱ्यांना नुकसान मदतीची रक्कम वाढवावी. पंचनामे वस्तुनिष्ठ करण्याची आमची मागणी आहे.- चंद्रशेखर रेबगोंडपूर्व विभाग अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना